शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

By admin | Updated: April 16, 2017 04:21 IST

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे.

- वसंत भोईर,  वाडा

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे. मात्र, येथील तब्बल ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फक्त सहा पोलीस असल्याने कुडूसकरांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.तालुक्यातील बराच मोठा भूभाग डि.प्लस झोन म्हणून जाहीर झाल्यापासून यथे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. परिणामी येथे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातून अनेक बेरोजगार येथे रोजच्या रोज येत आहेत. त्यामुळे २२ गावे, ४० पाडे याचा अतंर्भाव असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यातच तालुक्यात कामानिमीत्त येणाऱ्यांच्या लोकसंख्येची नोंद नाही. झापाट्याने विकसीत होणाऱ्या परिसरात काही वर्षात लोक संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात संबंधीत पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. कुडूससाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अनेक वर्षाची मागणी आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. कुडूस,चिंचघर, गुंज, उसर, मुसारणे, नारे, डाकिवली, चांबले, उचाट, डोंगस्ते, देवघर, बुधावली, काटी, कोंढले, म्हसवल, घोनसई मेट, वडवली, पैलंबार, सापरोंडे, मांगाठणे, वर्धा आदि ग्रामपंचायतींसह शेकडो कारखाने या पोलीस चौकीच्या कार्य क्षेत्रात येतात.कुडूस हे गाव भिवंडी व वाडा या दोन शहराच्या मधोमध असून तब्बल ५० गावची मुख्य बाजार पेठ आहे. भिवंडी येथे कापड उद्योग मोठा आहे. त्या अनुशंगाने येथे रोजच कामगारांची मोठी ये-जा असते. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. चोऱ्या, पाकिट मारी, रात्री अपरात्री लुटण्याचे प्रकार येथे अधुन मधुन होत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत कुडूसमधील रहिवाशांसाठी सध्या असलेले पोलिस बळ अत्यल्प आहे. वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे पोलिस ठाणे निर्मीतीची गरज आहे.- मेघना पाटील, सदस्य, पंचायत समीती, वाडायेथेनोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहेत. लोकांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढवणे आवश्यक आहे.- जितेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटनायेथे अनेक नवखे लोक बाजारहाट करण्यासाठी येतात. त्यातच गुन्हेगारीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनची अत्यंत गरज आहे.- अंजुमन सुसे, उपसरपंच, कुडूस