शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कुडूसकरांची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

By admin | Updated: April 16, 2017 04:21 IST

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे.

- वसंत भोईर,  वाडा

तालुक्यातील कुडूस परिसरात औद्योगिकरणामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले असून या वाढत्या लोकसंख्यमुळे गुन्हेगारीचे स्वरुप व प्रमाणही वाढले आहे. मात्र, येथील तब्बल ५० हजार लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फक्त सहा पोलीस असल्याने कुडूसकरांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे.तालुक्यातील बराच मोठा भूभाग डि.प्लस झोन म्हणून जाहीर झाल्यापासून यथे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली आहे. परिणामी येथे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातून अनेक बेरोजगार येथे रोजच्या रोज येत आहेत. त्यामुळे २२ गावे, ४० पाडे याचा अतंर्भाव असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. त्यातच तालुक्यात कामानिमीत्त येणाऱ्यांच्या लोकसंख्येची नोंद नाही. झापाट्याने विकसीत होणाऱ्या परिसरात काही वर्षात लोक संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्या प्रमाणात संबंधीत पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. कुडूससाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची अनेक वर्षाची मागणी आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. कुडूस,चिंचघर, गुंज, उसर, मुसारणे, नारे, डाकिवली, चांबले, उचाट, डोंगस्ते, देवघर, बुधावली, काटी, कोंढले, म्हसवल, घोनसई मेट, वडवली, पैलंबार, सापरोंडे, मांगाठणे, वर्धा आदि ग्रामपंचायतींसह शेकडो कारखाने या पोलीस चौकीच्या कार्य क्षेत्रात येतात.कुडूस हे गाव भिवंडी व वाडा या दोन शहराच्या मधोमध असून तब्बल ५० गावची मुख्य बाजार पेठ आहे. भिवंडी येथे कापड उद्योग मोठा आहे. त्या अनुशंगाने येथे रोजच कामगारांची मोठी ये-जा असते. त्यातून गुन्हेगारी वाढली आहे. चोऱ्या, पाकिट मारी, रात्री अपरात्री लुटण्याचे प्रकार येथे अधुन मधुन होत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत कुडूसमधील रहिवाशांसाठी सध्या असलेले पोलिस बळ अत्यल्प आहे. वाढत्या चोऱ्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे पोलिस ठाणे निर्मीतीची गरज आहे.- मेघना पाटील, सदस्य, पंचायत समीती, वाडायेथेनोकरीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहेत. लोकांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढवणे आवश्यक आहे.- जितेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटनायेथे अनेक नवखे लोक बाजारहाट करण्यासाठी येतात. त्यातच गुन्हेगारीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनची अत्यंत गरज आहे.- अंजुमन सुसे, उपसरपंच, कुडूस