शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

नालासोपारा विधानसभा सभेत कोकणी मतदारांचे प्राबल्य, बहुजन विकासच्या राजकारणाचे युतीपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 03:40 IST

नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे.

- सुनिल घरतपारोळ - नालासोपारा मतदारसंघातील मनवेल पाडा-कारगिलनगर या भागात कोकणी वोट बँक असून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये या विधानसभा मतदार संघातून कोणता पक्ष आघाडी घेईल हे कोकणी मतदारांवर अवलंबून असणार आहे.मुंबईमध्ये राहणारा चाकरमानी गेल्या पंधरा वर्षांपासून वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. साहजिकच या कोकणी मतांचा मोह कोणत्याही पक्षाला व्हावा. वसई-विरार शहरात बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापनेत प्रत्येक मोठ्या पक्षाला बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे समर्थन राहिले आहे. परिणामी वसईत या मित्रपक्षाला कोणीही बाधा पोहोचवली नव्हती. त्यामुळे बहुजन विकास आघाडीनेही एक-दोन मतपेढी सोडल्या तर सगळ्यांना गृहीतच धरले होते.मागील लोकसभा पोटनिवडणूक मात्र या सगळ्याला अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने आणि ही लढाई दोन्ही पक्षांसाठी अहंकाराची ठरल्याने बहुजन विकास आघाडीची आपल्याच घरात कोंडी झाली. अपेक्षेप्रमाणे राज्यात सत्ता असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची करून ही, लोकसभा पोटनिवडणूक जिंकली. तेव्हापासूनच या भागात विशेष महत्त्व प्राप्त झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कोकणी मतांचे महत्त्व ओळखून बविआच्या वॉर्डात हळदी-कुंकू आणि कोकण मेळाव्यांचे आयोजन या वर्षी केले होते त्यातून बविआला शह देण्याचा प्रयत्न केला होता.मनवेलपाडा-कारगिलनगर हा भाग मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत याच भागातून बविआने मताधिक्क्यात आघाडी घेतली होती. तर महापालिका निवडणुकीत या भागाचे तब्बल पाच प्रभागांत विभाजन झाले होते. या पाचही प्रभागांतून बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक कोकणी माणसाच्या मतांवर निवडून आले होते. मागील पाच वर्षांत मनवेलपाडा-कारगिलनगर भागाची लोकसंख्या लाखाच्या घरात गेली आहे. हा संपूर्ण भाग कोकणबहुल लोकवस्तीचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत या भागात २० हजारच्या आसपास नोंदणीकृत मतदार होते. या वेळी ही मतदार संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिच स्थिती वसईतील अन्य भागांतही आहे. त्यामुळेच या वार्डांवर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. या भागात असलेली कोकणबहुल लोकवस्ती भाजपचे मुख्य ‘टार्गेट’ असणार आहे.राजकारणातील तिढा : या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती व बहुजन विकास आघाडी या दोन लढत होण्याची शक्यता असून या भागात भाजपाने घेतलेल्या मेहनतीचा युतीला फायदा होईल का? तसेच, युतीच्या राजकारणातत नाराज असलेले राणे समर्थक शिवसेना उमेदवाराला मदत करतील का? हा ही युती समोर प्रश्न असून याचा फायदा बहुजन विकास आघाडी उचलेला का असाही प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVasai Virarवसई विरार