शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जमीन हडपण्यासाठी तरुणाचे अपहरण, केडीएमसीचे भाजपा गटनेते अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 06:35 IST

जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

कल्याण : जमीन हडपण्यासाठी इताडे गावातील संतोष पाटील या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केडीएमसीतील भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांच्याविरोधात करण्यात आला आहे. या घटनेला दोन वर्षे झाली असून अद्यापही त्याच शोध लागलेला नाही. पडघा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल असून पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. वरुण पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून वरुण पाटील यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे.इताडे गावातील अनिल पाटील दोन वर्षांपासून त्यांचा भाऊ संतोषच्या शोधात आहेत. २२ आॅगस्ट २०१६ रोजी संतोष कामानिमित्त उल्हासनगरला गेला होता. त्यानंतर, तो घरी परतलाच नाही. त्याची दुचाकी पश्चिमेतील प्रेम आॅटो परिसरात आढळली. पाटील कुटुंबीयाच्या आरोपानुसार, सावद गावातील २७ गुंठे जागा विकत घेण्यासाठी भाजपा नगरसेवक पाटील आणि त्यांचे साथीदार संतोषला भिवंडी येथील रजिस्टेÑशन कार्यालयात घेऊन गेले. मात्र, २७ ऐवजी ६६ गुंठे जागा वरुण आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या नावावर करून घेतली. संतोषने याला विरोध केला असता आरोपींनी त्याचे अपहरण केले. या घटनेला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. अजूनही संतोषचा शोध लागला नाही. वरुण याच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी राजकीय प्रभावामुळे पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे.भाजपा नगरसेवक वरुण पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करून नागरिकांची लूट करत आहेत. अशा अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. आम्ही पोलीस ठाण्यात जातो, तेव्हा पोलीस तपास सुरू असल्याचे सांगतात. या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही हे प्रकरण समोर आणले आहे.- विनया पाटील, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसपाटील कुटुंबाने ज्याला कुलमुखत्यारपत्र दिले होते, त्याच्याकडून ही जागा कायदेशीररीत्या विकत घेतली आहे. कुणाचीही फसवणूक केली नाही. ज्या माणसाचे अपहरण केल्याचा आरोप माझ्यावर आहे, त्याला मी कधी भेटलोही नाही. माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे.— वरुण पाटील, भाजपा गटनेते, केडीएमसी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnewsबातम्या