शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ठेका हातून जाण्याच्या भितीने अपहरण; पालघरच्या अपहरणामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:47 IST

कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली

पालघर : कारखान्यात सुरू असलेले कामाचा ठेका आपल्या हातून जाण्याच्या भितीने दहशतीचा वापर करून कंपनीतील देखरेख करणाऱ्या व्यक्तीलाचा उचलून नेल्याची माहिती अपहरण झालेल्या आरिफ याचे भाऊ मोहम्मद आसिफ अली यांनी लोकमतला दिली. ही अपहरण करण्याची घटना पालघरच्या औद्योगिक परिसरात गुरूवारी दुपारी घडली आहे.सातपाटी-पालघर जुन्या रस्त्यावरून आपल्या कंपनीत जाणाºया आरिफ मोहम्मद अली या कंपनी मालकांच्या अपहरणाबाबत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहरण करण्यात आलेले आरिफ यांचा स्वत:चा एक कारखाना पालघर पश्चिमेला आहे. त्याच पुढे असलेलेल्या कॉनवरा इंडस्ट्रीज या कंपनीचे लायजनिंगचे कामही याच्याच कडे होते. त्यामुळे त्यांच्या देखरेखीत सर्व काम सुरू होते. त्याच कंपनीत प्रशांत संखे या तरूणाचेही स्पेअर पार्ट पुरविण्याचा ठेका होता. ठेक्या बाबत गेले अनेक दिवस हमरीतुमरी सुरू होती.हातातील काम आरिफ अली यांच्यामुळे निसटत की काय ही भावना बळावल्याने प्रशांत संखे आणि इतर तीन यांनी कट रचून आरिफ अली हे अजय म्हस्के या कामगारासोबत रिक्षाने कंपनीकडे जात असतांना एका पिकअप गाडीने त्यांची रिक्षा अडवली. त्याचवेळी मागून आलेल्या स्कॉओेर्पिओ गाडीत त्यांना बळजबरीने कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अपहरणकर्त्याचा तपास करण्याचे पोलीस अधिकक्ष गौरव सिंह यांनी आदेश दिले आहेत. या अपहरणाच्या थराराने पालघरसह जिल्हयातील कारखानदारांवर दहशतीचे सावट पसरले आहे. तपास पथकाने बोईसर येथून अपहरण ज्या स्कॉर्पिओने केले होते. ती गाडी ताब्यात घेतली आहे. गुरूवारपासून अपहरणकर्ते आणि अपहरत आरीफ अली यांचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पथकाने डहाणू बोर्डी पर्यंत त्यांचा माग काढला आहे. संशयीत गाडीचा चारोटी येथील टोल प्लाझा वरून सी.सी. टीव्ही फुटेज तपासण्यात आली आहेत.प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन रडारवरया अपहरणप्रकरणी संशयी म्हणून पालघरमधील प्रशांत संखे, चिंनू संखे व प्रशांत महाजन अशा तीन व्यक्तीची नावे समोर आली असून त्यांचे शेवटचे लोकेशन डहाणू भागात असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र चोहोबाजूंनी फिरवल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत अपहरणकर्ते आरिफ यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या घरात चिंताग्रस्त वातावरण बनले आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलीस घेतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी व्यक्त केला आहे.दहशतीचा वापर करून कपंनी मालकाचे अपहरण होत असेल तर संरक्षणा अभावी कंपनी बंद करावी लागेल. पोलिसांनी आरिफ यांचा शोध घेऊन गुंडाना ताब्यात घ्यावे.- रायचंद शहा, अध्यक्ष,पालघर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन लि. पालघरअपहरण कर्त्यांच्या हातुन माझ्या पतीची सुखरुप सुटका करण्याची सर्वस्वी जबाबदारी पालघर पोलीसांची असून पोलीस अधिक्षकांनी यात जातीने लक्ष घातले पाहिजे.-शाहिस्ता अली, (आरिफ यांची पत्नी)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी