शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

‘कवी’ने वाढला समुद्रात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:26 PM

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा : वसई, उत्तन, अर्नाळा विरुद्ध पालघर, डहाणू

- हितेन नाईक 

पालघर : समुद्रातील मासेमारी क्षेत्राबाबत नियमावली बनविण्यात शासनाने दाखविलेल्या उदासीनतेचा फायदा उचलीत दुसरीकडे मच्छीमारांच्या लवादाचे निर्णय पायदळी तुडवीत वसई, उत्तन, अर्नाळा, मढ आदी भागातील काही मच्छीमारांनी समुद्रात थेट दिव-दमणपर्यंत कवीचे क्षेत्र विस्तारत नेले आहे. त्यामुळे पालघर-डहाणू भागातील मच्छीमाराचे मत्स्यउत्पादन कमालीचे घसरले. रोजीरोटीच्या प्रश्नासह डोक्यावर वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेल्या दमण ते दातीवरे मधील मच्छीमार एकजूट झाला असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आर या पार च्या लढाईची घोषणा देत धडक द्यायला सज्ज झाला आहे.

जिल्हा संरक्षण समितीने ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्र ारीची दखल घेत त्यांनी दोन्ही कडच्या मच्छीमारांची बैठक घेतली. त्यात पालघर, डहाणूतील मच्छीमारी व्यवसायावर अतिरिक्त कविमुळे विपरीत परिणाम होत असल्याने वसई-उत्तन मधील मच्छीमारांनी सातपाटी गावासमोरील ४२.५ सागरी मैलाच्या (नॉटिकल) पुढे ३२० डिग्री क्षेत्रातील सर्व कवी काढून टाकण्याचे आदेश दिले. त्या आदेशाच्या विरोधात २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वसईसह अन्य मच्छीमारांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला या संदर्भातील कायदे बनविण्याचे आदेश दिले. त्यानंतर १५ वर्षात अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली परंतु हा प्रश्न सुटावा असे कुणालाही मनापासून वाटले नाही.

सन १९८० च्या दरम्यान वसई तालुक्यातील काही मच्छीमारांनी दातीवरे, वडराई, सातपाटी गावाच्या समोरील समुद्रात खुंट रोवून अतिक्र मण केल्याने मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावर १९८२ मध्ये तालुक्यातील २८ गावांची समिती (लवाद) नियुक्त करून वसई, अर्नाळा भागातील मच्छीमारांनी एडवण ते वडराई गावाच्या मासेमारी क्षेत्र सोडून त्यांच्या बाहेरील क्षेत्रात कवी मारण्याची मुभा दिली होती. वरील गावे भविष्यात व्यवसायात प्रगतिशील झाल्यानंतर वसईच्या मच्छीमारांनी आपल्या कवी काढून घ्याव्यात असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.

लवादाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक भागातील मच्छीमार करीत आले असताना वसई तालुक्यातील मच्छीमारासह उत्तन, मढ आदी भागातील हजारो मच्छिमारांनी मात्र आपल्या कवींचे क्षेत्र थेट दिव-दमण, जाफराबाद पर्यंत विस्तारित नेले आहे. रूढी, रीती-रिवाज, लवाद याला कायदेशीर चौकट (शासन मान्यता) नसल्याने आणि समुद्रात कायदे बनविण्याच्या अनेक वर्षाच्या मागणीकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याने आपण समुद्रात कुठेही, कशाही पद्धतीचा अवलंब करून मासेमारी करू शकतो. या भावनेने १९८० पासून हळूहळू शेकडो कवींच्या संख्येने सुरू झालेली घुसखोरी आज हजारो कवींच्या संख्येत परिविर्तत झाले असल्याची टीका धंदा संरक्षण समितीचे उपाध्यक्ष सुभाष तामोरे यांनी केली आहे. या संदर्भात उत्तन येथील मिच्छमार नेते तसेच महाराष्ट्र मिच्छमार कृती समतिीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो ह्यांच्याशी प्रतिक्रि ये साठी अनेक वेळा मोबाईल वर संपर्क करूनही त्यांनी फोन उचलला नाही. कव म्हणजे काय?समुद्रात बोंबील अथवा पापलेट माश्याच्या मासेमारी साठी दोन लाकडी अथवा लोखंडी खांब (अंदाजे २० फूट ते ६० फूट) समुद्रातील तळ जमिनीच्या आत गाडले जातात. त्या दोन खांबांना डोल नेट पद्धतीचे जाळे लावले जाते.ह्या खांबांना ३० ते ४० फूट लांबीच्या जाडजूड दोरखंडाला तरंगते फ्लोट्स लावले जातात.अश्या एका बोटींच्या मालकीच्या ३० ते ४० कवी समुद्रात मारलेल्या असतात.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार