शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

'काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे', मच्छीमार संघटनेचं आक्रमक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 14:05 IST

स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २ऑक्टोबर रोजी आयोजित वाढवणं बंदरविरोधी हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला.

पालघर - वाढवणं बंदर उभारणी साठी केंद्र आणि राज्य सरकार आग्रही होत चालल्याने किनारपट्टीवरील विरोध आता वाढू लागला असून बोर्डी ते मुंबई दरम्यान च्या गावातील आंदोलनकर्त्यानी आज आक्रमक भूमिका घेतली.ह्या आंदोलनात मोठा सहभागी झालेल्या महिलांनी '' काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसे काटेंगे' अशी भूमिका घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपले इरादे स्पष्ट केले. वाढवणं बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्व मच्छिमार संघटना, आदिवासी संघटना,सेवाभावी संघटना,स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २ऑक्टोबर रोजी आयोजित वाढवणं बंदरविरोधी हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. किनारपट्टीवरील मुंबई, पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग आदी कोकणातील जिल्ह्यात ह्या बंद चे जोरदार पडसाद उमटले.पालघर जिल्ह्यातील सातपाटी,वाढवणं, बोर्डी, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू, चिंचणी, तारापूर, घिवली, उच्छेळी, दांडी, नवापूर, नांदगाव, मुरबे,वडराई,केळवे,एडवन,अर्नाळा, ते थेट मुंबई माहीम कुलाबा,कफपरेड,भाऊचा धक्का आदी भागात मोठा प्रतिसाद मिळाला.सातपाटी मधील सुमारे ७ ते ८हजार ग्रामस्थांनी गावातून रॅली काढून समुद्रावर एकत्र येत वाढवण बंदराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ह्यावेळी कुलाबा भाऊ धक्का,क्रॉफर्ड मार्केट,सह मुंबई,पालघर,आदी भागातील मासळी मार्केट बंद ठेवण्यात आली होती.     सध्या पालघर जिल्ह्यात निवडणुका असल्याने केंद्र व राज्य सरकारने निवडणुकी दरम्यान दबावाचे तंत्र उपजले असल्याने हाच दबाव निवडणूका संपल्यावर वाढवण बंदराच्या विरोधात काम करणाऱ्यां संघटना,लोकांवर लादला जाऊ शकत असल्याने हा दबाव उलथून टाकण्यासाठी महिला व तरुण वर्ग आज आक्रमक झाला होता.मच्छीमार,शेतकरी,डायमेकर, बागायतदार ह्यांना उध्वस्त करणारे हे बंदर कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही ह्या इर्षेने लोक पेटून उठले असुन कुठल्याही पद्धतीच्या दबावाला न जुमानता हे बंदर पुन्हा एकदा रद्द करण्याच्या इर्षेने पेटून उठला आहे. स्थानिकांच्या ह्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कुलाबा,कफपरेड, माहीम,वेसावे, आदी भागातील हजारो लोकानी आपल्या भागात मासेविक्री बंद ठेवली.  ह्यावेळी १७ नोव्हेंबर  मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.      देशाला अणु ऊर्जेत सक्षम बनावे म्हणून पोफरण,अक्करपट्टी आदी भागातील शेकडो शेतकरी,मच्छीमारांनी आपली घरे,व्यवसायावर नांगर फिरवीत आपल्या जमिनी फारसा विरोध न करता शासनाच्या हवाली केल्या.मात्र त्याची केंद्र व राज्य सरकारने फसवणूक करीत त्यांना मिळणाऱ्या सोईसुविधा,नोकऱ्यापासून वंचित ठेवल्याने तेथील लोकांना सरकार च्या विरोधात न्यायलयात जावे लागले आहे.त्यामुळे यापुढे शासनाच्या कुठल्याही आश्वासनांवर विश्वास ठेवायला स्थानिक लोक तयार नाहीत. मच्छीमारांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करणाऱ्या ह्या सरकार विरोधात स्थानिकांचा आक्रोश वाढत असून लोकप्रतिनिधींवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.कारण ह्याच लोकप्रतिनिधी,नेते ह्यांनी वाढवण व परिसरात मोठ्या जमिनी खरेदी केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले असून अनेक लोकप्रतिनिधी च्या विरोधात लोकांच्या मनात असंतोष खदखदताना त्यांच्यातील चर्चेतून दिसत आहे.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार