शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणजूवासीयांच्या नशिबी बोटीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:17 IST

वसई तालुक्यातील इतिहासकालीन गाव : पोकळ आश्वासने आणि राजकीय दुर्लक्षितता

- आशिष राणे 

वसई : भार्इंदर व नायगांव रेल्वे स्थानका दरम्यान असलेले आणि वसई तालुक्याच्या नकाशावरील एक बेट म्हणून चारी बाजूने पाण्याने वेढलेले असे नुकतेच केंद्र व राज्य सरकारच्या दृष्टिक्षेपात पडलेले हिरवेगार, रमणीय ‘पाणजू’ हे निसर्गरम्य गाव इतिहासकालीन आहे. या गावाची विशेष ओळख म्हणजे गावात जायला मुख्य असा कुठलाही रस्ता अथवा पादचारी पूल आजही स्वातंत्र्यांनंतर सुद्धा अस्तित्वात नाही. किंबहुना खरी शोकांतिका म्हणजे गावात फेरी बोटी शिवाय कुठलाही पर्याय नाही.

एकंदरीतच बोटीचा प्रवास ही बाब मुख्यत: पर्यटनासाठी उत्तम व चांगली वाटते, मात्र पाणजू वासियांच्या नशिबी मात्र आयुष्यभर फेरी बोटीनेच प्रवास लिहिला आहे. मग ऋ तू कुठलाही असो. या पाणजू गावात जाण्यासाठी नायगांव पश्चिमेस असलेल्या जेटी वरून फेरी बोट पकडावी लागते. ती गावकऱ्यांना ६ रु पये प्रती माणसी व बाहेरील व्यक्तीला १० रु पये भाडे आकारते. वसई तालुक्यातील जवळ-जवळ दोन हजारच्या लोकवस्तीचे हे गाव इतिहासकालिन नरवीर चिमाजी अप्पांच्या काळापासून अस्तित्वात असून ग्रामपंचातीकडून या गावाचा कारभार चालतो. मात्र, पलिकडच्या तिरावरील नायगाव हे गाव मात्र वसई-विरार शहर महानगरपालिकेत येते.

सरकारने हे पाणजू गाव नीती आयोगाच्या अखत्यारीत आणून या गावाला पर्यटन स्थळ म्हणून विशेष दर्जा देण्याचे घोषित केले आहे. तसेच येथील मुख्य रस्त्याचा विषय असेल अथवा गावातील सोयीसुविधा पाहता या संदर्भात पाणजू ग्रामपंचातीचे सरपंच आशिष भोईर यांनी सर्व योजनांती माहिती दिली.

पाणजू गावात प्रामुख्याने आगरी, कोळी समाजाची बºयापैकी वस्ती असून ग्रामस्थांचा शेती, रेती, मिठागर , भाजीपाला छोटी दुकाने, फेरी बोटी असे पारंपरिक व्यवसाय असून रेती बंद असल्याने हा धंदा व रोजगार बुडाला आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे बोटी किनाºयावर धूळखात उभ्या आहेत.

गावात वीज आहे, मात्र ही वीज व्यवस्था १९७९ साली आली तर गावात १२० वर्षे जुनी एक माध्यमिक शाळा आहे. विशेष म्हणजे गावात जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र असून डॉक्टर व पारिचारीकांचे एक उत्तम पथक आहे. खास म्हणजे पाणी सेवा मुबलक असून गावात घराघरात नळ सेवा देण्यात आली आहे.

स्वातंत्र मिळाले मात्र गावातील लोकांना ७० वर्ष झाली तरी अजून ही हक्काचा रस्ता नाही. या गावामध्ये निवडणुका आल्या की, राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी रस्ता देण्याचे गाजर दाखवत असतात मात्र, नंतर रस्त्याच्या प्रश्नाकडे पाठ फिरवतात. खासदार आणि आमदारांसह सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी एखादी दुर्घटना घडल्यावरच या पाणजू बेटावरील गावाला भेट देतात. गेली ७ दशके पाणजूवासीय बोटीने प्रवास इतरांच्या संपर्कात राहतता.

रस्त्याबाबतच्या शासकीय योजना फक्त कागदोपत्रीच रंगवल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे रेल्वे पुल देखील धुळखात पडला आहे या धोरणात बदल झाल्यास गावकऱ्यांची समस्या सुटणार आहे.पावसाळ्यात गावकºयांचा बोटीचा प्रवास जीवघेणापावसाळ्यामध्ये पाणजु गावातील रिहवासी आपला जीव मुठीत घेऊन जुन्या रेल्वे पुलावरु न प्रवास करतात, परंतु कधी-कधी वादळवारे व रेल्वेच्या स्लीपरमधील अंदाज ‘न’ आल्यामुळे अनेक जण मृत्यूमुखी पडतात.सुमारे दोन वर्षांपूर्वी बोटीमध्ये लग्नाची वरात जात असताना बोट उलटून काही जण दगावल्याची घटना देखील घडली आहे. अशा घटना घडल्यावर राजकीय प्रतिनिधी घटनास्थळी पोहचतात व रस्ता देण्याचे आश्वासन देतात, अशी आश्वासने अनेक वेळा देऊन झाली आहे.नायगांव ते भार्इंदर पर्यंत नवीन पुल मंजुर देखील झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. भोईर यांच्या सांगण्यानुसार केंद्रातील भाजप व राज्यातील भाजपने आमच्या गावाकडे लक्ष देऊन महत्वाची कामे करत आहेत त्यामुळे आम्ही समाधानी असल्याचा पुर्नरु चर भोईर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केला.