शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:54 IST

सेना-भाजपावर टीका : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

डहाणू : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जिवंतपणी कधी वनगांकडे पाहीले सुद्धा नाही. ते आता वनगांसाठी मते मागत आहेत. दानवेंना सवरा आणी वनगा यांच्यामध्ये फरक ओळखता येत नाही .जिवंत असताना कोणाला आठवण झाली नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र सर्वच दावेदार बनत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी येथे केली .काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा आदिवासींचे नेतृत्व करणारे आहेत. शिंगडा हे प्रशासनात राजकारणात शांतपणे काम करणारे अनुभवी नेते आहेत. शिंगडांना निवडुन देण्यासाठी साथ देण्याचे अवाहन अशोक चव्हाण यांनी केले. काÞँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वाणगाव येथे काँग्रेसचे उमेदवार दामु शिंगडा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.पालघर जिल्हा निर्मीतीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारचे योगदान आहे. तर या सरकारला ४ वर्षाच्या काळात अद्याप ३२ खात्याची कार्यालये उभारता आले नाहीत. ते विकास काय करणार?विनाशकारी प्रकल्प राबवुन जमीनी काढून घेण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरु केले आहे. हे प्रकल्प आणत असताना कोणी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे का? असा सवाल त्यांनी केला. या भागात चालणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेच्या निधीची तरतूद कमी केली, शिष्यवृत्ती कमी केली स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती असतांना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग कशासाठी पाहीजेत. अशी उपरोधीक टीका अशोक चव्हाण यांनी केली. या देशाला भाजपमुक्त करण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष एकत्र आणण्याची गरज आहे .सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे या सरकारचे काम सुरु आहे. भाजप सत्तेत असताना सर्व खात्यांचा वापर भाजपला ताकद देण्यासाठी करीत असल्याची टीका त्यांनी केली .तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच प्रश्न सोडवणारा आहे.असेही ते म्हणाले. या सरकारने अघोषित आणीबाणी घोषित केली आहे. भाजप सरकार उखडून फेकून टाका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.ठाकूर यांचे टीकास्त्रभाजप सरकारला आदिवासींसाठी वेळ नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री मते मागण्यासाठी चारचार वेळा तालुक्यात येतात. अशी टीका आमदार आनंद ठाकूर यांनी केली.पालकमंत्री मूग गिळून बसतात .निर्णय घेत नाही.त्यामुळे आदिवासींचा विकास रखडला आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण