शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:54 IST

सेना-भाजपावर टीका : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

डहाणू : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जिवंतपणी कधी वनगांकडे पाहीले सुद्धा नाही. ते आता वनगांसाठी मते मागत आहेत. दानवेंना सवरा आणी वनगा यांच्यामध्ये फरक ओळखता येत नाही .जिवंत असताना कोणाला आठवण झाली नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र सर्वच दावेदार बनत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी येथे केली .काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा आदिवासींचे नेतृत्व करणारे आहेत. शिंगडा हे प्रशासनात राजकारणात शांतपणे काम करणारे अनुभवी नेते आहेत. शिंगडांना निवडुन देण्यासाठी साथ देण्याचे अवाहन अशोक चव्हाण यांनी केले. काÞँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वाणगाव येथे काँग्रेसचे उमेदवार दामु शिंगडा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.पालघर जिल्हा निर्मीतीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारचे योगदान आहे. तर या सरकारला ४ वर्षाच्या काळात अद्याप ३२ खात्याची कार्यालये उभारता आले नाहीत. ते विकास काय करणार?विनाशकारी प्रकल्प राबवुन जमीनी काढून घेण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरु केले आहे. हे प्रकल्प आणत असताना कोणी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे का? असा सवाल त्यांनी केला. या भागात चालणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेच्या निधीची तरतूद कमी केली, शिष्यवृत्ती कमी केली स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती असतांना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग कशासाठी पाहीजेत. अशी उपरोधीक टीका अशोक चव्हाण यांनी केली. या देशाला भाजपमुक्त करण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष एकत्र आणण्याची गरज आहे .सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे या सरकारचे काम सुरु आहे. भाजप सत्तेत असताना सर्व खात्यांचा वापर भाजपला ताकद देण्यासाठी करीत असल्याची टीका त्यांनी केली .तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच प्रश्न सोडवणारा आहे.असेही ते म्हणाले. या सरकारने अघोषित आणीबाणी घोषित केली आहे. भाजप सरकार उखडून फेकून टाका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.ठाकूर यांचे टीकास्त्रभाजप सरकारला आदिवासींसाठी वेळ नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री मते मागण्यासाठी चारचार वेळा तालुक्यात येतात. अशी टीका आमदार आनंद ठाकूर यांनी केली.पालकमंत्री मूग गिळून बसतात .निर्णय घेत नाही.त्यामुळे आदिवासींचा विकास रखडला आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण