शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जयसागर डॅमची गळती थांबणार

By admin | Updated: March 27, 2016 02:18 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला लागलेली गळती थांबविणाऱ्या कामाची निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्यामुळे जव्हारकरांत समाधान व्यक्त होत आहे.

- हुसेन मेमन,  जव्हारशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला लागलेली गळती थांबविणाऱ्या कामाची निविदा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केल्यामुळे जव्हारकरांत समाधान व्यक्त होत आहे. या धरणातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमुळे वाया जात असल्याने नागरिकांत पाणीटंचाईची भीती व्यक्त होत होती. आधीच पाणीपुरवठा कमी होत आहे, त्यात ही गळती. तसेच नगरपालिकेने या कामाला विलंब होऊ नये म्हणून तातडीने निविदा मागविल्या होत्या. परंतु निविदांना सर्वसाधारण सभेची मंजुरी लागते आणि जव्हार नगरपरिषदेतील १७ पैकी १० सदस्य अपात्र घोषित केलेले असल्याने सर्वसाधारण सभाच होत नव्हती. म्हणून ही निविदा थेट जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आले होते. तसेच याचा पाठपुरावा मुख्याधिकारी वैभव विधाते आणि अभियंता बी.डी. क्षीरसागर हे सतत करीत असल्याने आणि नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी केलेल्या मागणीवरून पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दि. २१/०३/२०१६ रोजी निविदा प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे. जयसागर धरण हे संस्थानकालीन असून राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधले होते, परंतु दिवसागणिक लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे डॅमचे पाणी अपुरे पडत आहे. त्यात यंदाच्या वर्षात धरणाला चांगलीच गळती लागल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावरून तत्काळ दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, निविदा अथवा कुठल्याही प्रक्रियेला सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असल्यामुळे निविदा प्रकिया पूर्ण होऊनही सभेची मंजुरी नसल्यामुळे निविदा प्रकिया रखडून होती.सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत पाणी वाया जात आहे आणि निविदा प्रक्रिया पाणीपुरवठ्याशी निगडित असल्याने तसेच यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून ही बाब नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी निगडित असून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०९ अन्वये निकडीच्या परिस्थितीत विविक्षित कामाची अंमलबजावणी करण्याचे असाधारण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले असल्याने पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी त्यांच्या अधिकारानुसार काम पार पाडण्यास न्यूनतम दर असलेले श्रीशैल आसगी या निविदाकाराची निविदा मंजूर केली.आम्हाला हे समजल्यावर आम्ही तत्काळ धरणाला भेट देऊन गळती थांबवण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्याकरिता मुख्याधिकाऱ्यांना सुचवले व त्यानुसार निविदा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून तत्काळ गळती थांबवण्याचे काम सुरू केले आहे. - संदीप वैद्य, नगराध्यक्ष, जव्हार नगरपालिका, जव्हार