शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आमच्या गळ्यातील चेन मोडायची आलीय वेळ, कसले ‘ब्रेक द चेन’? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:33 IST

छोट्या व्यावसायिकांचे धंदे झाले बंद  : गृहिणींची घर चालवताना कसरत

- सुरेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू आहे. मात्र, त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य गृहिणींप्रमाणेच व्यापारी- व्यावसायिकांच्या कुटुंबांनाही घर चालविताना अडचणी येत आहेत. गळ्यातील ‘चेन’ मोडायची वेळ आहे, कसले आले आहे ‘ब्रेक द चेन’? असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.गेले संपूर्ण वर्ष कोरोना प्रादुर्भावाच्या छायेत वावरत असताना, करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. व्यवसाय समाधानकारक झालेला नाहीच. मात्र, त्याचवेळी खर्च वाढलेला आहे. शासनाचे विविध कर भरताना व लाइट बिलासह अन्ये बिले भरताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. अशा स्थितीत आम्हालाही आमचे घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक व्यावसायिकांच्या घरांतून त्यांच्या पत्नींकडून होताना दिसत आहेत.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे बराच काळ व्यवसाय चालला नाही. मध्यंतरी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर दुकाने, तसेच अन्य व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाले. सुमारे दोन महिने दुकाने- व्यवसाय सुरू झाल्यांतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे आता कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

गेले वर्षभर कोरोनामुळे ब्युटीपार्लर व्यवसाय सुरुवातीला बंद आणि आता थोडा सुरू झाला असतानाच पुन्हा दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पार्लरचे भाडे, बँकेचे हप्ते कसे फेडायचे? ब्रेक द चेन कसले? जगणे ब्रेक व्हायची वेळ आली आहे.    -भावना प्रजापती, ब्युटीपार्लर व्यावसायिक, तलासरीकपड्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. वर्ष कसेबसे काढले. पुन्हा ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दुकाने बंद झाली आहेत. आता घरखर्च चालवायचा कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.    - निमा अमरनाथ गुप्ता,     लेडीज गारमेंट, तलासरी

गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय व्यवसाय ठप्प झालेले आहे. आता कुठे सावरू लागला असतानाच व्यवसाय बंदमुळे आवक बंद असताना खर्च मात्र कमी होत नाही. त्यात बंदचा फायदा उचलत अनेक वस्तूंचे भाव वाढविण्यात आले. त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण झाले.    - मृदुला राजगिरे, दापचरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस