शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मागेल त्याला नळजोडणी मोहिमेला आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:13 PM

सात महिन्यांत ६०५६ जोडण्या : दोन महिन्यांपासून एकही नळजोडणी नाही

विरार : वसई-विरार परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. यातून सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला त्याला नळजोडणी असा प्रस्ताव पारित केला होता. या ठरावानुसार गेल्या सात महिन्यात ६, ०५६ नळजोडण्या पालिकेने केल्या आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शेकडो अर्ज येऊनही पालिकेने एकही जोडणी केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वसई - विरार महापालिकेने १९ डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला नळ जोडणीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. या मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सात महिन्यात १० हजारांहून अधिक अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यातील ६, ०५६ जोडण्या देण्यात आल्या आहेत.वसई - विरार महापालिका क्षेत्रास सूर्या, उसगाव पेल्हार या पाणीपुरवठा योजनेतून २०१७ पूर्वी केवळ १३० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर राज्यसरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत वाढीव १०० एमएलडी तसेच सूर्या टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याने वाढीव ७० एमएलडी पाणी महापालिकेला मिळाले आहे. तसेच ६९ गावांच्या पाणी पुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराचा पाणीसाठा वाढला आहे. याच धर्तीवर पालिकेने मागेल त्याला नळजोडणी मोहीम हाती घेतली होती. पण जानेवारीपासून सुरु झालेल्या या मोहिमेला निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसल्याने दोन महिन्यांपासून ही मोहीम बंद आहे.प्रभागवार जोडण्याप्रभाग प्राप्त अर्ज मंजूर अर्ज दिलेल्या जोडण्याअ ४६४ २०० ३००ब ५९५ ५२१ ५८७क ५२४ ४१३ ५५७ड ४४४ २७८ ७८९ई ३६२ ११० ३३६फ १७५२ १५२८ १३०१जी १६४१ ८९९ ११४९एच ५२३ ४७२ ७४८आय ६७८ ४२८ २५९शहर अभियंता माधव जावदे यांनी सांगितले की, आचारसंहिता असल्याने जोडणी करता आली नाही, पण ही मोहीम अजूनही सुरु आहे. नियमांत जे अर्ज बसतात त्यांना आम्ही जोडणी देत आहोत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार