शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

विमा कंपनीनेही फिरविली पाठ , बळीराजा मेटाकुटीला : पावसाने केली अवकृपा, पंचनामे करणारी महसूल यंत्रणा संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:31 IST

या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला

वसंत भोईरवाडा : या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे तसेच सध्या सतत पडत असणाºया पावसाने राहिलेले भातपीकसुद्धा वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप हंगाम २०१७ साठी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार हेक्टरी ७८० रुपये दराने भात पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे त्यासाठी विमा संरक्षण रक्कम ३९ हजार रुपये प्रति हेक्टर एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या या विम्याची जबाबदारी नॅशनल इन्शुअरन्स वर सोपवली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकºयांना ही रक्कम भरपाई म्हणून कंपनी देणार होती. हजारो शेतकºयांनी हा पीकविमा काढला आहे ज्यांनी पीककर्ज घेतले त्यांच्या कर्जातूनच वजा करण्यात आला होता. मात्र असे असूनसुद्धा आता मात्र ह्या विमा कंपन्यांने नैसर्गिक आपत्तीने आणि रोगाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेची फेड करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून महिना झाला त्याचा दमडा अजून मिळालेला नाही. हातातले पीक गेलेले आणि हप्ता घेऊनही विमा कंपनी भरपाईबद्दल शब्द उच्चारत नाही. अशा त्रांगड्यात बळीराजा सापडला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी