शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

विमा कंपनीनेही फिरविली पाठ , बळीराजा मेटाकुटीला : पावसाने केली अवकृपा, पंचनामे करणारी महसूल यंत्रणा संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:31 IST

या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला

वसंत भोईरवाडा : या तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. चवीला रु चकर असलेला वाडा कोलम खवैय्यांच्या आवडीचा तांदूळ आहे. मात्र या भाताच्या कोठारावर ह्या वर्षी निसर्गाने घाला घातला असून यंदा ५० ते ६० टक्के पीक रोगांनी आणि परतीच्या पावसाने नष्ट झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे तसेच सध्या सतत पडत असणाºया पावसाने राहिलेले भातपीकसुद्धा वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप हंगाम २०१७ साठी तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार हेक्टरी ७८० रुपये दराने भात पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे त्यासाठी विमा संरक्षण रक्कम ३९ हजार रुपये प्रति हेक्टर एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या या विम्याची जबाबदारी नॅशनल इन्शुअरन्स वर सोपवली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकºयांना ही रक्कम भरपाई म्हणून कंपनी देणार होती. हजारो शेतकºयांनी हा पीकविमा काढला आहे ज्यांनी पीककर्ज घेतले त्यांच्या कर्जातूनच वजा करण्यात आला होता. मात्र असे असूनसुद्धा आता मात्र ह्या विमा कंपन्यांने नैसर्गिक आपत्तीने आणि रोगाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कर्जाच्या रकमेची फेड करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा आहे. सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून महिना झाला त्याचा दमडा अजून मिळालेला नाही. हातातले पीक गेलेले आणि हप्ता घेऊनही विमा कंपनी भरपाईबद्दल शब्द उच्चारत नाही. अशा त्रांगड्यात बळीराजा सापडला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी