शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाईत आदिवासी-मच्छीमारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 06:59 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या अपघातग्रस्त व्यक्तींना सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित केले होते.

- हितेन नाईकपालघर : नैसर्गिक आपत्तीत नदी-नाल्याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्यास ४ लाख नुकसान भरपाई, तर समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास फक्त २ लाख नुकसान भरपाई देण्यात येते. केंद्र आणि राज्य शासनाच्या सन २०१५ च्या नैसर्गिक आपत्ती आदेशातील तब्बल दोन लाख फरकाच्या निर्णयाचा मोठा फटका आदिवासी बांधव आणि मच्छीमारांच्या कुटुंबियांना बसत आहे. यामुळे केंद्रातील निकषांचा आधार घेत राज्य शासनाने मासेमारी करताना समुद्रात पडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांस ४ लाख नुकसानभरपाई देण्याचे सुधारित आदेश काढावेत, यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या अपघातग्रस्त व्यक्तींना सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग दि. १३ मे २०१५ रोजी एक आदेश पारित केला असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर सुनिश्चित करण्यात आले आहेत. या निकषाला राज्य शासनाने स्वीकृती दिली असून त्यांची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. या आदेशाप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत एखादी व्यक्ती नदी, नाल्याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना महसूल विभागाकडून एका आठवड्यात ४ लाखाच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला जातो. परंतु समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अवघ्या २ लाखाचा धनादेश मिळण्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून वर्षभराचा अवधी लागतो.आॅगस्ट महिन्यात सातपाटी येथील एका मच्छीमाराची बोट वादळी वाºयात सापडली असताना त्या बोटीतून समुद्राच्या पाण्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी खलाशी कामगाराच्या कुटुंबाला केंद्राच्या निकषाचा ४ लाखाचा फायदा न देता राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या निकषाप्रमाणे अवघे २ लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. याचा मोठा फटका मासेमारी बोटीवर खलाशी कामगार म्हणून काम करणाया जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, पालघर येथील आदिवासी बांधवांना बसत आहे.यासंदर्भात मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती.मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे झालेल्या बैठकीचा संदर्भ देत एसटी विभागाच्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर प्रवाशांना देण्यात येणाºया ५ लाखाच्या भरपाईचा निकष मच्छीमारांना लावण्यात यावा, या त्यांच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ही विनंती मत्स्यव्यवसाय मंत्री शेख यांनी मान्य केल्याचे सांगून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मच्छीमार संघटनांनी दिली होती. मात्र या आश्वासनाची पूर्तता वर्षभराचा कालावधी उलटूनही झालेली नाही. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीस २ लाखाऐवजी ४ लाखाची रक्कम मिळण्याबाबत त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिवसेनेचे आ. श्रीनिवास वणगा आणि राष्ट्रवादीचे आ.सुनील भुसारा प्रयत्न करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.‘लोकमत’च्या वृत्ताची दखलनैसर्गिक आपत्तीत बाधित होणाºया मच्छीमारांना देण्यात येणाºया नुकसानभरपाई निधीमध्ये बदल ( सुधारणा) करण्यात यावी, असे वृत्त ‘लोकमत’ने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती व काही सहकारी संस्थांनी मच्छीमारांवर होणाºया अन्यायकारक तरतुदी शासन निर्णयातून वगळून सुधारित शासन निर्णय काढण्याची मागणीकेली होती.

टॅग्स :palgharपालघर