शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 6:36 AM

अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटना वाढल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वाड्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष

राहुल वाडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यांसाठी अग्निशमन दल नसल्याने येथील औद्योगिक पट्टय़ामध्ये तसेच भाताच्या भार्‍यांना लागणार्‍या आगी विझवणे अशक्य होत असून गत काही वर्षांमध्ये यात अनेकांचा जीव गेला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.वाडा तालुक्यातील औद्योगिक पट्टयात होणार्‍या अगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वाडा येथे अग्निशमन दलाची सध्यस्थित गरज भासत असल्याने या ग्रामीण भागासाठी येथीन सक्षम नगरपंचायतीवर अग्निशमन दल स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी उद्योजक व ग्रामस्थ करीत आहेत.  वाडा व विक्रमगड तालुका विकास क्षेत्र (डी. झोन) जाहिर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले पाय रोवले आहेत.  येथे मोठया प्रमाणावर लहान-मोठे रासायनिक कारखाने आहेत.  त्यात एखादी आग लागल्यास वा स्फोट झाल्यास दुरवर असलेल्या भिवंडी-पालघर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागते.   तर विक्रमगड, मोखाडा, खोडाळा या भागात कंपन्या जरी कमी असल्या तरी लहान मोठे उदयोग तसेच गवताच्या वखारी मोठया प्रमाणावर आहेत. विक्रमगड तालुक्यात गवत पाओली वखार व्यवसाय मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या वखारींना आग लागून मोठे नुकसान होण्याची भिती असते.  पाली येथील टायर कंपनीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत कंपनीचे मटेरियल जळून खाक झाले होते.  तर झडपोली येथील सांबरे यांचे गवताच्या वखारीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत गवताची गंज जळून खाक झाले होते.  यामध्ये कोटयांवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषण