शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:37 IST

अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटना वाढल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वाड्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष

राहुल वाडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यांसाठी अग्निशमन दल नसल्याने येथील औद्योगिक पट्टय़ामध्ये तसेच भाताच्या भार्‍यांना लागणार्‍या आगी विझवणे अशक्य होत असून गत काही वर्षांमध्ये यात अनेकांचा जीव गेला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.वाडा तालुक्यातील औद्योगिक पट्टयात होणार्‍या अगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वाडा येथे अग्निशमन दलाची सध्यस्थित गरज भासत असल्याने या ग्रामीण भागासाठी येथीन सक्षम नगरपंचायतीवर अग्निशमन दल स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी उद्योजक व ग्रामस्थ करीत आहेत.  वाडा व विक्रमगड तालुका विकास क्षेत्र (डी. झोन) जाहिर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले पाय रोवले आहेत.  येथे मोठया प्रमाणावर लहान-मोठे रासायनिक कारखाने आहेत.  त्यात एखादी आग लागल्यास वा स्फोट झाल्यास दुरवर असलेल्या भिवंडी-पालघर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागते.   तर विक्रमगड, मोखाडा, खोडाळा या भागात कंपन्या जरी कमी असल्या तरी लहान मोठे उदयोग तसेच गवताच्या वखारी मोठया प्रमाणावर आहेत. विक्रमगड तालुक्यात गवत पाओली वखार व्यवसाय मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या वखारींना आग लागून मोठे नुकसान होण्याची भिती असते.  पाली येथील टायर कंपनीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत कंपनीचे मटेरियल जळून खाक झाले होते.  तर झडपोली येथील सांबरे यांचे गवताच्या वखारीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत गवताची गंज जळून खाक झाले होते.  यामध्ये कोटयांवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषण