शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:41 IST

पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते.

पालघर :- पाकिस्तानच्यातुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचांपाकिस्तानीतुरुंगात मृत्यू झाल. नवीन वर्षाची सुरुवातच अशा वाईट बातमीने झाल्यामुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानी देशाच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. मृत पावलेल्या कामगाराला २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सेक्युरिटी एजन्सीने  धरपकड केली होती आणि त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली असल्याचे जेष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई ह्यांनी सांगितले. तो भारतीय असल्याचे पण भारताने पाकिस्तानला आधीच कळवलेल होते. २००८ च्या एग्रिमेन्ट ऑन कॉन्सुलर एक्सेसच्या कलम (५) मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, "शिक्षा पूर्ण झाल्याच्या आणि राष्ट्रीयता ठरल्याच्या एका महिन्यात दुसऱ्या देशाच्या कैद्यांना सोडण्याचं आणि त्याला त्याच्या देशात पाठविण्यास दोन्ही देश सहमत आहेत." या कराराप्रमाणे तो आधीच सुटायला हवा होता. पाकिस्तानातील तुरुंगातील भारतीय कैदी आणि भारतातील त्यांच्या नातेवाईकांमध्ये पत्रव्यवहार नसल्याने ते प्रचंड तणावात जगतात. 

२१६ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या मलिर जेल, कराची, येथील तुरुंगात आहेत. त्यापैकी जवळपास १७० मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. आणि त्यांची राष्ट्रीयता पण ठरली आहे. त्या सगळ्यांना पाकिस्तानने तत्काळ सोडावे अशी मागणी जतीन देसाई, पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते ह्यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.

टॅग्स :Fishermanमच्छीमारpalgharपालघरPakistanपाकिस्तानjailतुरुंग