शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

भारतीय मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:41 IST

पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते.

पालघर :- पाकिस्तानच्यातुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचांपाकिस्तानीतुरुंगात मृत्यू झाल. नवीन वर्षाची सुरुवातच अशा वाईट बातमीने झाल्यामुळे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छीमारांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानी देशाच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. मृत पावलेल्या कामगाराला २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सेक्युरिटी एजन्सीने  धरपकड केली होती आणि त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली असल्याचे जेष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई ह्यांनी सांगितले. तो भारतीय असल्याचे पण भारताने पाकिस्तानला आधीच कळवलेल होते. २००८ च्या एग्रिमेन्ट ऑन कॉन्सुलर एक्सेसच्या कलम (५) मध्ये स्पष्ट लिहिले आहे की, "शिक्षा पूर्ण झाल्याच्या आणि राष्ट्रीयता ठरल्याच्या एका महिन्यात दुसऱ्या देशाच्या कैद्यांना सोडण्याचं आणि त्याला त्याच्या देशात पाठविण्यास दोन्ही देश सहमत आहेत." या कराराप्रमाणे तो आधीच सुटायला हवा होता. पाकिस्तानातील तुरुंगातील भारतीय कैदी आणि भारतातील त्यांच्या नातेवाईकांमध्ये पत्रव्यवहार नसल्याने ते प्रचंड तणावात जगतात. 

२१६ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या मलिर जेल, कराची, येथील तुरुंगात आहेत. त्यापैकी जवळपास १७० मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. आणि त्यांची राष्ट्रीयता पण ठरली आहे. त्या सगळ्यांना पाकिस्तानने तत्काळ सोडावे अशी मागणी जतीन देसाई, पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते ह्यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.

टॅग्स :Fishermanमच्छीमारpalgharपालघरPakistanपाकिस्तानjailतुरुंग