शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:21 IST

शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांची उपस्थिती : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांचा आरोप

वाडा : शेतमालाला दीडपट हमीभाव देऊन शेतकरी आत्महत्या रोखू असे म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून या सरकारच्या काळात भ्रमनिरास झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्यांत वाढ झाली असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वाडा येथे केली.

भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकरी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी उत्पादन करण्यात कुठेही कमी पडला आहे. शेतीकरीता आलेले नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करत शेतकºयांनी शेतीचे उत्पादन वाढविले. आज कुठेही भूकबळी पडत नाहीत मात्र शेतकरी आत्महत्या करू लागलेत याला आजवरच्या सरकारांची ध्येयधोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

गत कॉंग्रेस सरकारच्या काळात आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या होत होती. मात्र भरमसाठ अश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात हे प्रमाण दोन तासावर आल्याने हे चित्र भयावह असल्याने केवळ कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला पर्याय म्हणून कॉंग्रेस अशी निवड करणे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात गरीबांचे - शेतकरी- कष्टकरी वर्गाचे सरकार सत्तेवर यावे म्हणून व्यापक प्रबोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. आजवरच्या सरकारांनी शहरांमध्ये स्वस्त मजूर हवेत म्हणून शेतकºयांच्या विरोधात धोरणे राबविल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. या मारक धोरणाविरोधात सर्व शोषित समाजाने उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असे म्हणत भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका पाटील यांनी यावेळी केली. तर देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार गरिबांच्या विरोधात आहे.

मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी कष्टकरी वर्गाला संकटात टाकले असून वाढत्या महागाईने हा वर्ग त्रस्त बनला आहे. या सरकारच्या काळात सर्वच समाजघटक अडचणीत आले असून देशाचा मूळ आधार असलेली लोकशाही धोक्यात आल्याची टीका भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे केंद्रीय समतिी सदस्य राजेंद्र परांजपे यांनी यावेळी केली.

यावेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, बुलेट ट्रेनसह विविध लादलेले प्रकल्प रद्द करावेत, सिक्शनच्या जमिनी शेतकºयांना परत करा, फॉरेस्ट प्लॉट कसणाºया शेतकऱ्यांच्या नावे करा, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा द्या यासह अन्य मागण्या करणारे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.

या मोर्चात कॉ. बळीराम चौधरी, संज्योत राऊत, कमा टबाले, लहानू डावरे, रामचंद्र गिंभल, काळूराम लोखंडे, मोहन बोरसे, विष्णू पाडवी, शंकर भोईर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी