शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:21 IST

शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांची उपस्थिती : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांचा आरोप

वाडा : शेतमालाला दीडपट हमीभाव देऊन शेतकरी आत्महत्या रोखू असे म्हणत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून या सरकारच्या काळात भ्रमनिरास झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्यांत वाढ झाली असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वाडा येथे केली.

भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकरी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी उत्पादन करण्यात कुठेही कमी पडला आहे. शेतीकरीता आलेले नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करत शेतकºयांनी शेतीचे उत्पादन वाढविले. आज कुठेही भूकबळी पडत नाहीत मात्र शेतकरी आत्महत्या करू लागलेत याला आजवरच्या सरकारांची ध्येयधोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

गत कॉंग्रेस सरकारच्या काळात आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या होत होती. मात्र भरमसाठ अश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात हे प्रमाण दोन तासावर आल्याने हे चित्र भयावह असल्याने केवळ कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला पर्याय म्हणून कॉंग्रेस अशी निवड करणे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे येत्या काळात गरीबांचे - शेतकरी- कष्टकरी वर्गाचे सरकार सत्तेवर यावे म्हणून व्यापक प्रबोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. आजवरच्या सरकारांनी शहरांमध्ये स्वस्त मजूर हवेत म्हणून शेतकºयांच्या विरोधात धोरणे राबविल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. या मारक धोरणाविरोधात सर्व शोषित समाजाने उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असे म्हणत भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर जोरदार टीका पाटील यांनी यावेळी केली. तर देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार गरिबांच्या विरोधात आहे.

मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी कष्टकरी वर्गाला संकटात टाकले असून वाढत्या महागाईने हा वर्ग त्रस्त बनला आहे. या सरकारच्या काळात सर्वच समाजघटक अडचणीत आले असून देशाचा मूळ आधार असलेली लोकशाही धोक्यात आल्याची टीका भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे केंद्रीय समतिी सदस्य राजेंद्र परांजपे यांनी यावेळी केली.

यावेळी पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, बुलेट ट्रेनसह विविध लादलेले प्रकल्प रद्द करावेत, सिक्शनच्या जमिनी शेतकºयांना परत करा, फॉरेस्ट प्लॉट कसणाºया शेतकऱ्यांच्या नावे करा, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा द्या यासह अन्य मागण्या करणारे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.

या मोर्चात कॉ. बळीराम चौधरी, संज्योत राऊत, कमा टबाले, लहानू डावरे, रामचंद्र गिंभल, काळूराम लोखंडे, मोहन बोरसे, विष्णू पाडवी, शंकर भोईर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी