शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पालघर जिल्ह्यात अपुरा धान्यपुरवठा

By admin | Updated: September 26, 2015 00:40 IST

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१०

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील गरीब व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थी कुटुंबांना सप्टेंबर महिन्यातील सणासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर, ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ तर २८ हजार ४७० क्विंटल गव्हाचे नियतन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिले होते. परंतु सप्टेंबर महिना संपत आला तरी अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात साखरेचे वाटप लाभार्थ्यांना झाले असून अनेक भागात अपुरा पुरवठा करण्यात आला आहे.जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा हे सहा तालुके आदिवासी बहुल तालुके म्हणून ओळखले जात असून पालघर व वसई हे तालुके अंशत: आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत असलेल्या प्राधान्य कुटूंबा (पिवळे रेशनकार्डधारक कुटूंब व अंत्योदय कार्डधारक) च्या १४ लाख २३ हजार ५९५ लाभार्थ्यांना हे धान्य वितरीत करण्यात येणार होते. त्यासाठी प्राधान्य कुटुंबातील प्रतिकार्डधारकाला २५ किलो तांदुळ याप्रमाणे ४२ हजार ४५० क्विंटल तांदुळ तर १० किलो गहु या प्रमाणे ९८७० क्विंटल गहु व ०.६६० ग्रॅम साखर प्रती माणशी वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील प्रती माणशी ५०० ग्रॅम साखर वाटप करण्यात येत असले तरी सप्टेंबर महिन्यात आलेल्या सणासाठी प्रती मानशी ६६० ग्रॅम साखरेचे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन त्यासाठी ४ हजार ८७५ क्विंटल साखर आठ तालुक्यातील वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. जव्हार तालुक्यातील १ लाख १६ हजार ८० लाभार्थ्यांसाठी ५१७ क्विंटल साखर, विक्रमगड तालुक्यात १ लाख २६ हजार ६६९ लाभार्थ्यांसाठी ५६४ क्विंटल, मोखाडा तालुक्यातील ८२ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी ३६६ क्विंटल, पालघर तालुक्यातील १ लाख ९७ हजार ७६१ लाभार्थ्यांसाठी ८८० क्विंटल साखर, डहाणू तालुक्यातील २ लाख ४२ हजार ६६६ लाभार्थ्यांसाठी १०८१ क्विंटल, तलासरी तालुक्यातील १ लाख २० हजार ४०८ लाभार्थ्यांसाठी ५३६ क्विंटल साखर, वाडा तालुक्यातील १ लाख २१ हजार ९६९ लाभार्थ्यांसाठी ५४३ क्विंटल तर वसई तालुक्यातील ८७ हजार १६४ लाभार्थ्यांसाठी ३८८ क्विंटल साखरेचे वाटप करण्याची मंजुरी देण्यात आलेली होती. आॅगस्ट २०१५ मध्ये तालुक्यातील गोदामामध्ये शिल्लक असलेली ३३९०.३६ क्विंटल साखरही सप्टेंबर महिन्यात वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले होते.परंतु आजही अनेक तालुक्यात साखरेचे वाटप करण्यात आले नसून अनेक भागात अपुरे वाटप झाले आहे. (वार्ताहर)