शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

निरी-आयआयटीच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई तुंबली! निधीअभावी चार वर्षांपासून अहवालाची अंमलबजावणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:33 IST

मागील तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे २०१८ नंतर पुन्हा वसई-विरार शहरांत पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

जगदीश भोवड, लोकमत न्यूज नेटवर्क 

वसई : मागील तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे २०१८ नंतर पुन्हा वसई-विरार शहरांत पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. २०१८ च्या पूरस्थितीनंतर महापालिकेने निरी-आयआयटी या संस्थांच्या मदतीने शहरांतील पूरस्थितीचा अभ्यास केला होता. मात्र, या संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, महापालिकेने शहरात कामे केल्याचे दिसून येत नाही.

अहवालाकडे दुर्लक्ष केल्याने वसई महापालिकेत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र आहे.  महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या संस्थांची मिळून सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. मागील काही वर्षांत विरार पश्चिमेकडील हरित पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.

विहिरी, बावखळे यांसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आले. सागरी नियंत्रण क्षेत्र, पाणथळ जागा व कांदळवने नष्ट झाली. या संरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणात मातीभराव झालेला आहे, याचे परिणाम पावसाचे पाणी समुद्रात जाऊन मिळण्याचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तुंगारेश्वर हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालेले असतानाही त्याचे संरक्षण करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.निरी-आयआयटीचे चार अहवाल प्राप्त झाले आहेत. ही कामे करण्यासाठी किमान ३०० कोटींची गरज आहे. महापालिकेने ११७.१९ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. मात्र तरीदेखील सध्या जी स्थिती उद्भवत आहे, ती पाहता आपल्याला आवश्यक ती कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत.    

- अनिलकुमार पवार, महापालिका आयुक्त 

काय म्हटले आहे ‘या’ अहवालात?

    पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) विकसित करणे.    शहराचे नियोजन करावे तसेच नैसर्गिक पाणी जाण्याच्या मार्गातील अतिक्रमण बाजूला करून मार्ग मोकळे करावेत.    पावसाचे पाणी जाण्याच्या मार्गांची विकास आराखड्यात नोंद करून त्याच्या आजूबाजूला कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये.    मोकळ्या जागेच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाणारे पुराचे सर्व पाणी तलावात वळवणे आणि ‘रेन हार्वेस्टिंग’ प्रकल्पही राबवणे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfloodपूरRainपाऊस