शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागांवरील अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:45 IST

पर्यावरण संवर्धन समितीचा इशारा; वसईच्या पश्चिम पट्ट्यात अतिक्रमण

वसई : वसईतील पश्चिम पट्ट्यातील भुईगाव येथील पाणथळ जागेवरील त्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ही कारवाई वेळीच न झाल्याने आता पुन्हा नव्याने पर्यावरण संवर्धन समिती आक्र मक झाली आहे. याबाबत महसूल व पालिका प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीतर्फे देण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई पश्चिमेकडील भुईगाव या समुद्रकिनारपट्टी भागातील सरकारच्या मालकीच्या पाणथळ जमिनीवरील कांदळवनांची बेसुमार कत्तल करून तेथे बेकायदा भराव करण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त येथे अनेक ठिकाणी अनधिकृत कोळंबी प्रकल्प आणि घरे देखील बांधण्यात आली आहेत. पाणथळीच्या भागात काहींनी पाचशे फूट रूंद आणि तीनशे फूट लांबीच्या तसेच आठ फूट उंचीच्या दोन दगडी भिंतीही बांधल्या आहेत. येथील पाणथळीवरील हजारो तिवरांची बहुमोल वनसंपदा नष्ट करून मोडके-तोडके अवशेष आता याठिकाणी पाहावयास मिळत आहेत.याविरोधात ‘हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान’ तथा ‘पर्यावरण संवर्धन समिती’ या दोन संघटना आजमितीला लढा देत आहेत. मात्र, वसईची महसूल, महापालिका आणि पोलीस यंत्रणा हे काम तातडीने करत नसल्याचा गंभीर आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.पाणथळ जागेवरील अतिक्र मणांबाबत हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान आणि मुंबईतील वनशक्ती या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयात जुलै २०१६ मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला जाब विचारला असता महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड. मातोस आाि वसईचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी दादाराव दातकर यांनी भुईगाव येथे कांदळवनांची कत्तल करून या जमिनीवर अतिक्र मणे झाल्याचे मान्य केले होते. त्यानुसार ही अतिक्रमणे पाडून टाकण्यासाठी एका आठवड्याचा अवधीही मागितला होता. त्यावर २५ जुलै २०१६ रोजी ही अतिक्र मणे काढण्याची धडक मोहीम सुरू केली जाईल, असे हमीपत्रही मुंबई उच्च न्यायालयास दिले होते. मात्र, आजपर्यंत एकाही अतिक्रमणावर कारवाईच झाली नसल्याचे पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी स्पष्ट केले.२ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण !भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे आणि कोळंबी प्रकल्प निष्कासित करावी या मागणीसाठी २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त आणि प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.