शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

पाणथळ जागांवरील अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:45 IST

पर्यावरण संवर्धन समितीचा इशारा; वसईच्या पश्चिम पट्ट्यात अतिक्रमण

वसई : वसईतील पश्चिम पट्ट्यातील भुईगाव येथील पाणथळ जागेवरील त्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ही कारवाई वेळीच न झाल्याने आता पुन्हा नव्याने पर्यावरण संवर्धन समिती आक्र मक झाली आहे. याबाबत महसूल व पालिका प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीतर्फे देण्यात आल्याची माहिती समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई पश्चिमेकडील भुईगाव या समुद्रकिनारपट्टी भागातील सरकारच्या मालकीच्या पाणथळ जमिनीवरील कांदळवनांची बेसुमार कत्तल करून तेथे बेकायदा भराव करण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त येथे अनेक ठिकाणी अनधिकृत कोळंबी प्रकल्प आणि घरे देखील बांधण्यात आली आहेत. पाणथळीच्या भागात काहींनी पाचशे फूट रूंद आणि तीनशे फूट लांबीच्या तसेच आठ फूट उंचीच्या दोन दगडी भिंतीही बांधल्या आहेत. येथील पाणथळीवरील हजारो तिवरांची बहुमोल वनसंपदा नष्ट करून मोडके-तोडके अवशेष आता याठिकाणी पाहावयास मिळत आहेत.याविरोधात ‘हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान’ तथा ‘पर्यावरण संवर्धन समिती’ या दोन संघटना आजमितीला लढा देत आहेत. मात्र, वसईची महसूल, महापालिका आणि पोलीस यंत्रणा हे काम तातडीने करत नसल्याचा गंभीर आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे.पाणथळ जागेवरील अतिक्र मणांबाबत हरित नैसर्गिक वैभव बचाव अभियान आणि मुंबईतील वनशक्ती या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयात जुलै २०१६ मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला जाब विचारला असता महाराष्ट्र सरकारचे वकील अ‍ॅड. मातोस आाि वसईचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी दादाराव दातकर यांनी भुईगाव येथे कांदळवनांची कत्तल करून या जमिनीवर अतिक्र मणे झाल्याचे मान्य केले होते. त्यानुसार ही अतिक्रमणे पाडून टाकण्यासाठी एका आठवड्याचा अवधीही मागितला होता. त्यावर २५ जुलै २०१६ रोजी ही अतिक्र मणे काढण्याची धडक मोहीम सुरू केली जाईल, असे हमीपत्रही मुंबई उच्च न्यायालयास दिले होते. मात्र, आजपर्यंत एकाही अतिक्रमणावर कारवाईच झाली नसल्याचे पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर वर्तक यांनी स्पष्ट केले.२ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण !भुईगाव येथील सरकारी पाणथळ जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे आणि कोळंबी प्रकल्प निष्कासित करावी या मागणीसाठी २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त आणि प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.