शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:08 IST

कर्जाची रक्कम ३ कोटी २४ लाख : कर्ज माफ करा अन्यथा पालघर जिल्हयात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता

- रविंद्र साळवे 

मोखाडा : पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळाचे संकट जव्हार मोखाड्यावर कोसळले आहे. दि ठाणे मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ३ कोटी २४ लाख ६६ हजाराचे पिक कर्ज कसे फेडायचे कसे असा प्रश्न एक हजार ४८१ शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.

अतिदुर्गम दरी खोºयात वसलेल्या मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे या ठिकाणी उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेऊन येथील आदिवासी शेती करत असतो .

वरई, नागली, तूर, उडीद, भात, खुरासणी आदि पिकांचे उत्पादन झाल्यावर यातील वरई उडीद व भात ह्याची विक्री करून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते परंतु या वर्षी शेतीतून पीक येण्या ऐवजी शेतकºयांच्या हाती पेंढाच आला आहे.

सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी उत्साहात विविध पिकांची लावणी केली. परंतु पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतांना पावसाने ओढ दिल्याने शेतीवर झालेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कडक उन्हात शेती जागच्या जागीच करपून गेली यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी शेतकºयांनी शेताला आगी लावून दिल्या यामुळे दुष्काळाच्या खाईत बुडालेल्या शेतकºयांना बँकांकडून घेतलेली पीक कर्जे कशी काय फेडायची असा प्रश्न छळतो आहे. तो वेळीच सोडवला नाही तर शेतकºयाच्या आत्महत्यांचे सत्र पालघर जिल्हयातही मोठया प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता शेतकºयांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली.

दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीच्या उत्पादनातून पिका ऐवजी पेंढाच हाती आला आहे यामुळे येथील गरीब शेतकरी पीक कर्ज कसे फेडणार यामुळे सरकारने प्रथमता मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करून पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे-सुनिल भुसारा,( जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर)

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या