शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:08 IST

कर्जाची रक्कम ३ कोटी २४ लाख : कर्ज माफ करा अन्यथा पालघर जिल्हयात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता

- रविंद्र साळवे 

मोखाडा : पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळाचे संकट जव्हार मोखाड्यावर कोसळले आहे. दि ठाणे मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ३ कोटी २४ लाख ६६ हजाराचे पिक कर्ज कसे फेडायचे कसे असा प्रश्न एक हजार ४८१ शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.

अतिदुर्गम दरी खोºयात वसलेल्या मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे या ठिकाणी उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेऊन येथील आदिवासी शेती करत असतो .

वरई, नागली, तूर, उडीद, भात, खुरासणी आदि पिकांचे उत्पादन झाल्यावर यातील वरई उडीद व भात ह्याची विक्री करून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते परंतु या वर्षी शेतीतून पीक येण्या ऐवजी शेतकºयांच्या हाती पेंढाच आला आहे.

सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी उत्साहात विविध पिकांची लावणी केली. परंतु पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतांना पावसाने ओढ दिल्याने शेतीवर झालेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कडक उन्हात शेती जागच्या जागीच करपून गेली यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी शेतकºयांनी शेताला आगी लावून दिल्या यामुळे दुष्काळाच्या खाईत बुडालेल्या शेतकºयांना बँकांकडून घेतलेली पीक कर्जे कशी काय फेडायची असा प्रश्न छळतो आहे. तो वेळीच सोडवला नाही तर शेतकºयाच्या आत्महत्यांचे सत्र पालघर जिल्हयातही मोठया प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता शेतकºयांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली.

दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीच्या उत्पादनातून पिका ऐवजी पेंढाच हाती आला आहे यामुळे येथील गरीब शेतकरी पीक कर्ज कसे फेडणार यामुळे सरकारने प्रथमता मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करून पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे-सुनिल भुसारा,( जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर)

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या