शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

जिल्हा बँकेचे पीक कर्ज आता फेडायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:08 IST

कर्जाची रक्कम ३ कोटी २४ लाख : कर्ज माफ करा अन्यथा पालघर जिल्हयात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची शक्यता

- रविंद्र साळवे 

मोखाडा : पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळाचे संकट जव्हार मोखाड्यावर कोसळले आहे. दि ठाणे मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले ३ कोटी २४ लाख ६६ हजाराचे पिक कर्ज कसे फेडायचे कसे असा प्रश्न एक हजार ४८१ शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.

अतिदुर्गम दरी खोºयात वसलेल्या मोखाडा तालुक्यात २५९ गावपाडे असून लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे या ठिकाणी उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही पारंपरिक पद्धतीने बँकेकडून कर्ज घेऊन येथील आदिवासी शेती करत असतो .

वरई, नागली, तूर, उडीद, भात, खुरासणी आदि पिकांचे उत्पादन झाल्यावर यातील वरई उडीद व भात ह्याची विक्री करून बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाते परंतु या वर्षी शेतीतून पीक येण्या ऐवजी शेतकºयांच्या हाती पेंढाच आला आहे.

सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकºयांनी उत्साहात विविध पिकांची लावणी केली. परंतु पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असतांना पावसाने ओढ दिल्याने शेतीवर झालेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कडक उन्हात शेती जागच्या जागीच करपून गेली यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी शेतकºयांनी शेताला आगी लावून दिल्या यामुळे दुष्काळाच्या खाईत बुडालेल्या शेतकºयांना बँकांकडून घेतलेली पीक कर्जे कशी काय फेडायची असा प्रश्न छळतो आहे. तो वेळीच सोडवला नाही तर शेतकºयाच्या आत्महत्यांचे सत्र पालघर जिल्हयातही मोठया प्रमाणात सुरू होण्याची दाट शक्यता शेतकºयांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली.

दुष्काळामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीच्या उत्पादनातून पिका ऐवजी पेंढाच हाती आला आहे यामुळे येथील गरीब शेतकरी पीक कर्ज कसे फेडणार यामुळे सरकारने प्रथमता मोखाडा, जव्हार हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करून पीक कर्ज माफ करावे अशी आमची मागणी आहे-सुनिल भुसारा,( जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पालघर)

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या