शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रुळांमधून जीवघेणा प्रवास किती काळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:45 IST

वाढीववासीयांची व्यथा : महिनाभरापासून धोकादायक प्रवास; लोखंडी प्लेट्स बसवणार कधी?

हितेन नाईक पालघर : वैतरणा रेल्वे स्थानकावर पोहचण्यासाठी वाढीव येथील विद्यार्थी, रुग्णांना वैतरणा खाडीवरील रेल्वे पुलाच्या दोन ट्रॅकमधील मोकळ्या जागेतून जाण्याव्यतिरिक्त कुठलाही अन्य पर्याय उपलब्ध नसतो. त्यातच आता त्यांच्या मार्गातील लोखंडी प्लेट्स सडून खाडीत पडल्याने त्यांचा मार्ग धोकादायक बनला असून या प्लेट्स रेल्वे प्रशासनाकडून बसवून दिले जात नसल्याने सर्व नागरिकांना रेल्वे ट्रॅकमधून जीवावर उदार होत प्रवास करावा लागतो आहे.

बाजारहाट, रुग्णालये, नोकरी आदीसाठी उत्तरेकडील सफाळे स्टेशन तर विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगारासाठी दक्षिणेकडील वैतरणा स्टेशन आजपर्यंत गाठावे लागते. या दोन्ही स्थानकात पोहोचायचे असेल तर चार रेल्वे ट्रॅकमधील मोकळ्या जागेत टाकण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्यावरून चालत जात स्टेशन गाठावे लागते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंचा सामना करून मोठी जोखीम पत्करूनच हा रोजचा धोकादायक प्रवास आम्हाला करावा लागत असल्याचे भोईर यांनी लोकमतला सांगितले.पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला वैतरणा खाडीच्यामध्ये वाढीव-वैतीपाडा ही दोन बेटे असून या पाड्यांची लोकसंख्या सुमारे २ हजार इतकी आहे. शेती आणि रेती व्यवसायाव्यतिरिक्त त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेही साधन उपलब्ध नाही. रेती उत्खननावर बंदी तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने त्यांच्या शेतात खारे पाणी शिरून शेती नापीक बनण्याच्या घटना नेहमीच्या बनल्या आहेत. या भागातून ४० विद्यार्थी तर १५ ते २० महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी रोज जात असतात. तर दुसरीकडे उदरनिर्वाहासाठी इथले नागरिक, तरुणांना मुंबई, पालघर, तारापूर एमआयडीसीत जाण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने दररोज पहाटे या धोकादायक पुलावरूनच स्टेशन गाठावे लागत असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले. प्रशासनाकडून आजपर्यंत दुर्लक्षित गाव - पाडे म्हणून आम्हाला वागणूक मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होणे, आरोग्य उपकेंद्रातून पुरेशी वैद्यकीय सेवा न मिळणे, पिण्याच्या पाण्यासाठी पावसाचे पाणी भरून त्या साठवून ठेवलेल्या पाण्यावर गुजराण करणे आदी डझनभर समस्यांशी आम्ही अनेक वर्षांपासून झगडत असल्याचे प्रफुल भोईर यांचे म्हणणे असून प्रशासन मात्र आमच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ट्रॅकमधून चालत असताना येणाऱ्या-जाणाºया ट्रेनमधून प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या, नारळ खाडीत फेकत असल्याने अनेक प्रवाशांचे मृत्यू होतात, तर कित्येक महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्याच महिन्यात रोहिणी पाटील आणि वैशाली पाटील या दोन महिला निर्माल्याच्या पिशव्यांचा फटका बसून जखमी झाल्या. तसेच एखादी ट्रेन आल्यास खाली बसावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार?गेल्या आठवड्यात या पुलावरच्या लोखंडी प्लेट्स खाली पडल्यानंतर हा नेहमीचा मार्ग धोकादायक बनला. त्यानंतर ग्रामस्थांनी वैतरणा, सफाळे स्टेशन मास्तरशी संपर्क साधला असता त्यांना थेट डहाणू स्टेशन अधीक्षक कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले.तरीही त्यावर काहीच उपाययोजना केल्या जात नव्हत्या. या मार्गातील लोखंडी प्लेट्स निघून गेल्याने सुमारे दोन हजार रहिवाशांना जीवावर उदार होत रुळांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.रेल्वे अधिकाऱ्यांशी अनेकवेळा भेटी घेतल्यानंतरही उपाय योजना आखल्या जात नसल्याने दुर्दैवी अपघाताच्या घटना घडल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.लोखंडी प्लेट बदलण्याचे काम इंजीनिअर विभागाने हाती घेतले आहे. - बाळाराम जी,स्टेशन मास्तर, वैतरणा 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारrailwayरेल्वे