शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

सर्व्हर डाऊन, कर्जमाफीचा अर्ज करावा कसा? तत्काळ उपाययोजना करण्याची शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 3:12 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

बोर्डी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र पालघर जिल्ह्यात सर्व्हरडाउन होत असल्याने शेवटच्या घटकाला अर्ज दाखल करण्यात येणा-या अडचणी येत आहेत. दरम्यान तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.राज्य शासनाने शेतकºयांना एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा आहे. शेतकºयांनी अर्जातील आधार क्र मांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड, पत्नीची माहिती, उत्पन्न आदी नोंदी भराव्या लागतात. त्यानंतर थंब मशीनद्वारे उमटणारी प्रिंट घेऊन लॉग इन करावे लागते. मात्र सर्व्हर डाउन होण्याची समस्या डहाणूसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भेडसावत आहे. त्यामुळे काही वेळेला एक अर्ज भरून घेण्यासाठी अनेक तासांचा अवधी असल्याने दिवसागणिक खूपच कमी अर्ज भरले जातात. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊन ताटकळत बसावे लागल्याने शेतकरी राजा वैतागला आहे. उत्सवाचे दिवस असल्याने रोज घराबाहेर पडणे शक्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.डहाणू तालुक्यातील ३८ महा ई सेवा केंद्र आणि ८० कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये सारखीच परिस्थिती आहे. ग्रामपंचायतीला फॉर्म भरून घेण्याचे निर्देश असतांना तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा सुरू नसल्याने शेतकºयांना अन्य ठिकणी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून ही सेवा तत्काळ सुरू व्हावी, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.सहकार आणि पणनमंत्री सुभास देशमुख यांनी शेवटच्या घटकाला येणाºया समस्या सोडविण्यासाठी स्थानिक अधिकाºयानी लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबाजवणी न झाल्यास १५ सप्टेंबरची वाढीव मुदत उलटूनही अनेक वंचित राहण्याची शक्यता आहे.काही सायबर कॅफे चालकांनी हा फॉर्म भरून घेण्यासाठी शेतकºयांकडून जादा पैसे उकळण्यास सुरु वात केली आहे. शिवाय महा ई सेवा आणि कॉमन सर्व्हिस सेंटरना भेडसाविणारी सर्व्हर डाऊनची समस्या सायबर कॅफे चालकांना का होत नाही? याची शहानिशा जिल्हाधिकाºयांनी करणे आवश्यक आहे.- गौरव पाटील,महा ई सेवा केंद्रचालक