शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

म्हाडा गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 22:44 IST

म्हाडा व स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा व दुर्लक्ष : मूलभूत सुविधांचीच कमतरता, रहिवाशी संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : म्हाडाच्या कोकण विभागाने २०१४, २०१६ आणि २०१८ साली विरार बोळींज येथील सदनिकांची सोडत काढली होती. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना १०० टक्के रक्कम भरून ताबा देण्यात आला. मात्र या गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत. म्हाडा व स्थानिक प्रशासनही त्याकडे निष्काळजीपणा दाखवून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या प्रकल्पातील नागरिक करीत आहेत.या गृहप्रकल्पात सहभागी झालेल्या सदनिकाधारकांनी म्हाडाची सदनिका आणि त्यासंदर्भात सुविधा असतील या भाबड्या आशेपोटी उर्वरित रक्कम म्हाडाला विहित मुदतीत भरली. सुरुवातीला म्हाडाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे अर्जदारांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बऱ्याच वेळा चकरा मारल्यानंतर कामे होत होती. या सर्व दिव्यातून जाऊन म्हाडाने सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात केली. परंतु बरीच कामे अपूर्ण होती. उदा.विजेची जोडणी, पाण्याची जोडणी, सामायिक सुविधा, कचºयाची समस्या इत्यादी. सध्या जवळपास १५०० विजेत्यांनी सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. बरेच सदनिकाधारक राहायला यायला तयार नाहीत. कारण मूलभूत सुविधांचीच कमतरता आहे.सदनिकाधारकांनी वेळोवेळी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वरील बाबी आणून सुद्धा म्हाडाकडून कुठलीही अपेक्षा पूर्ण होत नाही आहे. म्हाडाच्या अधिकाºयांनी आश्वासन दिले की, आॅक्टोबर २०१९ पर्यंत महापालिकेच्या पाण्याची जोडणी होईल. परंतु आजतागायत याबाबत एक छोटेसे काम पण झालेले दिसत नाही. सध्या म्हाडा वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. वसई-विरार महापालिकेचे पाण्याचे कनेक्शन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत टँकरने पुरेसे पाणी पुरवठा करणार असे सांगितले, परंतु टँकरनेही दररोज पाणीपुरवठा होत नाही. जे पाणी सध्या पुरवले जाते ते पिण्यालायक तर अजिबात नाही. टँकरने पुरवले जात असलेले पाणी एकदम गढूळ असते अशी नागरिकांची तक्रार आहे.किमती कमी करण्यासाठी निवेदनफेब्रुवारी २०१९ पासून या सदनिकांच्या किमती रेडी रेकनर व बाजारभावापेक्षा चढ्या असल्याने त्या कमी करण्यासाठी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत व म्हाडा प्रशासन यांना निवेदन दिले होते. त्यानंतर म्हाडाचे अधिकारी विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करत २०४ रुपये प्रति चौरस फूट दराने कमी केल्या जातील व त्याचा लाभ २०१८ च्या लॉटरी विजेत्यांसोबतच २०१४ व २०१६ च्या लॉटरी विजेत्यांनाही रोख रकमेच्या स्वरूपात मिळेल, अशी माहिती देण्यात आली होती.मात्र गेल्या दहा महिन्यात म्हाडा प्रशासनाने चालढकल केल्याचा आरोप केला जात आहे. ३ डिसेंबर २०१९ च्या जीआरनुसार ४० ते ५० हजार रुपये मूळ किमतीमध्ये कपात करून कमी केलेल्या मोबाईल सेवाशुल्काच्या पद्धतीने वळता करून घेण्याचा निर्णय लागू केला आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने पुन्हा विरारच्या रहिवाशांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसलीआहेत, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.म्हाडाने भरपाई का देऊम्हाडाकडून सुविधा पुरवण्यास कितीही विलंब लागला तरी चालतो, परंतु जर विक्रीची किंमत वेळेत भरली नाही तर ११ टक्के व्याजाने वसूल केले जाते. म्हणजेच म्हाडाला सर्व काही माफ, पण तेच सामान्य माणसाला थोडा विलंब झाला तर ११ टक्के व्याज भरावे लागते आणि काही सदनिकाधारकांनी तर जवळपास १ लाख रुपये व्याज भरलेले आहे. मग सुविधा पुरवण्यात विलंब झाल्यास म्हाडाने भरपाई का देऊ नये, असा उद्विग्न प्रश्न रहिवासी विचारात आहेत.म्हाडाची लॉटरी लागल्यापासून ते प्रत्यक्षात घराचा ताबा मिळेपर्यंतची किचकट प्रोसेस, म्हाडाच्या ढिसाळ नियोजनामुळे येणाºया अडचणी, प्रामुख्याने पाणीटंचाई आणि हे स्वप्नातले घर घेण्यासाठी उभारलेला कर्जाचा डोंगर पाहिल्यास रहिवाशांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला दिसत नाही. अशा सर्व गंभीर समस्यांनी म्हाडा विरार बोळींज रहिवासी त्रासलेले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे. नये?