शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:54 IST

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला.

पालघर : रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक बंद पडली. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०० मिमी. पाऊस झाला असून एका नव्या विक्र माच्या दिशेने पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून गणेशोत्सवाचे दहाही दिवस पावसातच गेले. मध्येच थोडी विश्रांती घेतली तरी पाऊस काही थांबत नाही. रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशीराने धावत होत्या. तर मुंबईच्या दिशेने जाणाºया उदयपूर - बांद्रा एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत माघारी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील जवळपास २ ते ३ हजार बोटी समुद्रातगणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या विश्रांतीनंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागातील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले. समुद्रात गेलेल्या बोटींमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या घरच्यांची काळजी वाढली आहे. घरातील वायरलेस सेटवरून त्यांच्याशी संपर्क साधून सर्व सुखरूप असल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे.जिल्ह्यातील पावसाचा ३००० मिमी.चा टप्पा पारपालघर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ३३००.३८ मिमी. पावसाची नोंद झाली असून वसई ३१९४.१६ (१७८.९६ टक्के), वाडा ३७८३.४५ (१४७.८६), डहाणू २९७२.८५(१६३.२८), पालघर ३४१७.५८ (१९७.३८), जव्हार ३५५०.६१ (१०८.४१), मोखाडा ३३१९.६० (१५३.८८), तलासरी २७८३.५९ (१६३.३१), विक्रमगड ३३५८.७६ (१०४.७९) एकूण जिल्ह्यात १४४.७७ टक्के पावसाची नोंद.>वसई-विरार पुन्हा जलमयविरार : शनिवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुन्हा नुकसान झाले. वसई - विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाईन रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. रविवारी पहाटे नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ सुरु झाली.पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यातच येथे पूरिस्थती निर्माण झाली होती. एकाच आठवड्यात पुन्हा अशी परिस्थिती आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.पाणी शिरल्याने घरातील सामानाचेच नाही तर नागरिकांच्या गाड्यांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. पालिका प्रशासन यावर कसलीच ठोस उपाय योजना करत नसल्याने नागरिकांना सतत पुरिस्थतीचा सामना करावा लागत आहे.