शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:54 IST

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला.

पालघर : रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक बंद पडली. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०० मिमी. पाऊस झाला असून एका नव्या विक्र माच्या दिशेने पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून गणेशोत्सवाचे दहाही दिवस पावसातच गेले. मध्येच थोडी विश्रांती घेतली तरी पाऊस काही थांबत नाही. रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशीराने धावत होत्या. तर मुंबईच्या दिशेने जाणाºया उदयपूर - बांद्रा एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत माघारी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील जवळपास २ ते ३ हजार बोटी समुद्रातगणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या विश्रांतीनंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागातील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले. समुद्रात गेलेल्या बोटींमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या घरच्यांची काळजी वाढली आहे. घरातील वायरलेस सेटवरून त्यांच्याशी संपर्क साधून सर्व सुखरूप असल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे.जिल्ह्यातील पावसाचा ३००० मिमी.चा टप्पा पारपालघर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ३३००.३८ मिमी. पावसाची नोंद झाली असून वसई ३१९४.१६ (१७८.९६ टक्के), वाडा ३७८३.४५ (१४७.८६), डहाणू २९७२.८५(१६३.२८), पालघर ३४१७.५८ (१९७.३८), जव्हार ३५५०.६१ (१०८.४१), मोखाडा ३३१९.६० (१५३.८८), तलासरी २७८३.५९ (१६३.३१), विक्रमगड ३३५८.७६ (१०४.७९) एकूण जिल्ह्यात १४४.७७ टक्के पावसाची नोंद.>वसई-विरार पुन्हा जलमयविरार : शनिवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुन्हा नुकसान झाले. वसई - विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाईन रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. रविवारी पहाटे नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ सुरु झाली.पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यातच येथे पूरिस्थती निर्माण झाली होती. एकाच आठवड्यात पुन्हा अशी परिस्थिती आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.पाणी शिरल्याने घरातील सामानाचेच नाही तर नागरिकांच्या गाड्यांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. पालिका प्रशासन यावर कसलीच ठोस उपाय योजना करत नसल्याने नागरिकांना सतत पुरिस्थतीचा सामना करावा लागत आहे.