शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

सुटीचा रविवार गेला पाण्यात वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:54 IST

रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला.

पालघर : रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यांसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक बंद पडली. पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ३३०० मिमी. पाऊस झाला असून एका नव्या विक्र माच्या दिशेने पावसाची दमदार वाटचाल सुरू आहे.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून गणेशोत्सवाचे दहाही दिवस पावसातच गेले. मध्येच थोडी विश्रांती घेतली तरी पाऊस काही थांबत नाही. रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या थोड्या उशीराने धावत होत्या. तर मुंबईच्या दिशेने जाणाºया उदयपूर - बांद्रा एक्स्प्रेस या गाडीला वलसाड स्थानकात थांबवून परत माघारी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.जिल्ह्यातील जवळपास २ ते ३ हजार बोटी समुद्रातगणेशोत्सवानिमित्त घेतलेल्या विश्रांतीनंतर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, एडवन, मुरबे, डहाणू आदी भागातील २ ते ३ हजार बोटी समुद्रात रवाना झाल्या आहेत. रविवार सकाळपासून वायरलेस सेटवरून या बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचे कव-दालदा संघर्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मेहेर यांनी सांगितले. समुद्रात गेलेल्या बोटींमधील आपल्या नातेवाईकांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या घरच्यांची काळजी वाढली आहे. घरातील वायरलेस सेटवरून त्यांच्याशी संपर्क साधून सर्व सुखरूप असल्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सतत सुरू आहे.जिल्ह्यातील पावसाचा ३००० मिमी.चा टप्पा पारपालघर जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ३३००.३८ मिमी. पावसाची नोंद झाली असून वसई ३१९४.१६ (१७८.९६ टक्के), वाडा ३७८३.४५ (१४७.८६), डहाणू २९७२.८५(१६३.२८), पालघर ३४१७.५८ (१९७.३८), जव्हार ३५५०.६१ (१०८.४१), मोखाडा ३३१९.६० (१५३.८८), तलासरी २७८३.५९ (१६३.३१), विक्रमगड ३३५८.७६ (१०४.७९) एकूण जिल्ह्यात १४४.७७ टक्के पावसाची नोंद.>वसई-विरार पुन्हा जलमयविरार : शनिवारी रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे पुन्हा नुकसान झाले. वसई - विरार येथे यंदा सलग सहाव्यांदा पाणी भरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत उद्भवणाºया पूरिस्थतीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.बोळिंज, विराट नगर, विवा कॉलेज रोड, अचोले, नालासोपारा पश्चिम, एव्हरशाईन रोड, इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते. रविवारी पहाटे नागरिकांच्या घरात पाणी शिरू लागल्याने लोकांची धावपळ सुरु झाली.पहाटे अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यातच येथे पूरिस्थती निर्माण झाली होती. एकाच आठवड्यात पुन्हा अशी परिस्थिती आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.पाणी शिरल्याने घरातील सामानाचेच नाही तर नागरिकांच्या गाड्यांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. पालिका प्रशासन यावर कसलीच ठोस उपाय योजना करत नसल्याने नागरिकांना सतत पुरिस्थतीचा सामना करावा लागत आहे.