शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी केली वीज बिलांची होळी; महावितरणला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 23:22 IST

सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.

बोईसर : सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) चे अध्यक्ष डि. के. राऊत यांचे नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता टीमाच्या कार्यालयपासून एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून वीज बिलांची होळी करून उपकार्यकारी अभियंता मदन राठोड यांना निवेदन दिले. यावेळी टीमाचे पदाधिकारी वेलची गोगरी, पापा ठाकूर, जगन्नाथ भंडारी, एस. आर. गुप्ता, रवी भावसार, शिरीष नाडकर्णी , पूनम कटारिया यांच्यासह उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होतेआयोगाच्या नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार आॅगस्ट २०१८ पर्यंत असलेले वीजदर पुढे मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. सप्टेंबर २०१८ मधील दरवाढ व पॉवर फॅक्टर पेनल्टी पूर्णपणे रद्द करण्यात यावी. दर स्थिर ठेवण्यासाठी मागील सरकारने जानेवारी २०१४ पासून दरमहा ६०० कोटी रु. प्रमाणे दहा महिन्यासाठी ६०००/- कोटी रु. अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने औद्योगिक वीजदर स्थिर ठेवण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते २०२० या १९ महिन्यासाठी ३४००/- कोटी रु .अनुदान द्यावे. शेजारील सर्व राज्यांच्या समपातळीवर येईपर्यंत वीजदर स्थिर ठेवण्यात यावेत या मुख्य मागण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही दिनांक १२ सप्टेंबर २०१८ च्या निकालाद्वारे पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६५० उद्योग व यंत्रमाग या वीज ग्राहकांना सर्वांनाच दरवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे . १ सप्टेंबर २०१८ पासून प्रत्यक्ष लागू झालेली दरवाढही कमी नाही तर एप्रिल २०१८ मध्ये साधारणत: २ टक्के वाढ लागू आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मधील वाढ अल्प म्हणजे 3 ते ४ टक्के आहे.सव्वाशे कोटींचा महसूलतारापूर एमआयडीसीमध्ये एस टीचे ४६० , एल टी चे ११८०, ई एचव्हीचे ७ असे मिळून एकूण १६४७ वीज ग्राहक असून एस. टी. चे वीज ग्राहक ७० ते ७५ , एल. टी चे १२ ते १३ तर , ई एच व्ही चे ६० असे मिळून सुमारे १५० मिलियम युनिट (एम.यु. ) (१० लाख युनिट म्हणजे १ एम. यु.) वीज वापरत असून महिना काठी फक्त तारापूर एमआयडीसी मधून सुमारे १२५ करोड रुपयांचा महसूल महावितरणला मिळत आहे

टॅग्स :mahavitaranमहावितरण