शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विक्रमगडकरांच्या मोगऱ्याचा सुगंध हिरमुसला; गिऱ्हाईक नसल्याने शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:52 IST

अनेक गावांत होते लागवड, मात्र मजुरीपेक्षा दर कमी असल्याने फुले फेकून देण्याची वेळ

राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुका हा मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. रोज अंदाजे १२-१३ टन मोगºयाच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने संचारबंदी लागू झाल्याने मोगºयाला गिºहाईक नाही आणि निर्यातही होत नाही. ऐन लग्नसराईचा सिझन निघून गेल्याने मोगरा उत्पादक शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि आता मोगºयाला भाव मिळत नसल्याने असलेला मोगरा फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

तालुक्यातील खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात शेतकºयांनी मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्नातून प्रति किलो ३०० ते ५०० रुपये इतका दर मिळतो. मात्र कोरोना संसर्गामुळे गिºहाईकच नसल्याने मोगºयाचे भाव २० रुपये किलो झाले आहेत, तर मजुरांना कळ्या खुडण्यासाठी किलो मागे ४० रुपये द्यावे लागत असल्याने मजुरीपेक्षा मालाचा भाव कमी येत आहे. तर विकण्यासाठी पाठवलेल्या कळ्यांना गिºहाईक नसल्याने व्यापारी परत त्या कळ्या पुन्हा शेतकºयांकडे पाठवातात. त्यामुळे या कळ्या फेकून देण्याची वेळ शेतकºयावर आली आहे.कोरोनामुळे तर ऐन लग्नसराईच्या मोसमातही मोगºयाला मागणी नव्हती आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर तर गिºहाईकच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. मोगºयाच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात, परंतु यंदा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने आदिवासी शेतकºयांचे पार कंबरडे मोडले आहे.श्रावण महिन्यात भाव वाढण्याची आशा, पण...सध्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. परंतु, श्रावण महिन्यात मोगºयाच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे फुलांचे भाव पुढील काही काळात वाढतील, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, तोपर्यंत कोरोनाचे संकट संपावे, अशीही प्रार्थना शेतकरी करीत आहेत.कोरोनाचा संसर्ग व पाऊस यामुळे मोगरा निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. फुलांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे माल जास्त परंतु मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून उत्पादकांचा भांडवली खर्च निघत नाही. - निलेश चौधरी, मोगरा उत्पादक शेतकरी

या वर्षी कोरोनामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराईचा ऐन सिझन निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता पाऊस सुरू झाल्याने गिºहाईक मिळत नसल्याने केवळ २० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत. तर, कळ्या काढण्यासाठी मजुरांना ४० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे मोगरा फेकूनसुद्धा द्यावा लागत आहे. -हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी श्रावण महिन्यात व गणेशोत्सवात तरी बाजारभावात वाढ होईल, या आशेवर मोगºयाची जोपासना करीत आहोत. - प्रवीण कनोजा, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

टॅग्स :Farmerशेतकरी