शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

कोरोनामुळे विक्रमगडकरांच्या मोगऱ्याचा सुगंध हिरमुसला; गिऱ्हाईक नसल्याने शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:52 IST

अनेक गावांत होते लागवड, मात्र मजुरीपेक्षा दर कमी असल्याने फुले फेकून देण्याची वेळ

राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुका हा मोगरा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. रोज अंदाजे १२-१३ टन मोगºयाच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने संचारबंदी लागू झाल्याने मोगºयाला गिºहाईक नाही आणि निर्यातही होत नाही. ऐन लग्नसराईचा सिझन निघून गेल्याने मोगरा उत्पादक शेतकºयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि आता मोगºयाला भाव मिळत नसल्याने असलेला मोगरा फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

तालुक्यातील खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहर्जा अशा अनेक गावात शेतकºयांनी मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मोगºयाचे दररोज साधारण ५ ते १५ किलो उत्पन्नातून प्रति किलो ३०० ते ५०० रुपये इतका दर मिळतो. मात्र कोरोना संसर्गामुळे गिºहाईकच नसल्याने मोगºयाचे भाव २० रुपये किलो झाले आहेत, तर मजुरांना कळ्या खुडण्यासाठी किलो मागे ४० रुपये द्यावे लागत असल्याने मजुरीपेक्षा मालाचा भाव कमी येत आहे. तर विकण्यासाठी पाठवलेल्या कळ्यांना गिºहाईक नसल्याने व्यापारी परत त्या कळ्या पुन्हा शेतकºयांकडे पाठवातात. त्यामुळे या कळ्या फेकून देण्याची वेळ शेतकºयावर आली आहे.कोरोनामुळे तर ऐन लग्नसराईच्या मोसमातही मोगºयाला मागणी नव्हती आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर तर गिºहाईकच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. मोगºयाच्या शेतीमुळे वर्षाकाठी लाखो रुपयाची उलाढाल येथील शेतकरी करत असतात, परंतु यंदा संपूर्ण हंगाम वाया गेल्याने आदिवासी शेतकºयांचे पार कंबरडे मोडले आहे.श्रावण महिन्यात भाव वाढण्याची आशा, पण...सध्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. परंतु, श्रावण महिन्यात मोगºयाच्या फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे फुलांचे भाव पुढील काही काळात वाढतील, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, तोपर्यंत कोरोनाचे संकट संपावे, अशीही प्रार्थना शेतकरी करीत आहेत.कोरोनाचा संसर्ग व पाऊस यामुळे मोगरा निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. फुलांचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे माल जास्त परंतु मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून उत्पादकांचा भांडवली खर्च निघत नाही. - निलेश चौधरी, मोगरा उत्पादक शेतकरी

या वर्षी कोरोनामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराईचा ऐन सिझन निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता पाऊस सुरू झाल्याने गिºहाईक मिळत नसल्याने केवळ २० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत. तर, कळ्या काढण्यासाठी मजुरांना ४० रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे मोगरा फेकूनसुद्धा द्यावा लागत आहे. -हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी श्रावण महिन्यात व गणेशोत्सवात तरी बाजारभावात वाढ होईल, या आशेवर मोगºयाची जोपासना करीत आहोत. - प्रवीण कनोजा, मोगरा उत्पादक शेतकरी, विक्रमगड

टॅग्स :Farmerशेतकरी