शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

चारोटी येथे महामार्गावर पुलावरून कार नदीत पडली, दोन ठार, तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 22:15 IST

डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले.

- शशिकांत ठाकूरकासा- डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी नदीत पडून झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन गंभीर जखमी झाले असून जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार चारोटी येथील गुलजारी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठडाला आढळून दोन पुलाच्या मध्ये गाडी नदीत कोसळली. त्यामध्ये गाडी खोल दगडावर जाऊन पडली असता गाडीचा चक्काचूर झाला. मात्र कासा पोलीस व नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केल्याने गाडीतील सर्व जखमींना कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान ओमप्रकाश चंद्रिका दुबे (वय 45) व रोहित दुबे( वय 40) दोघेही राहणार सांताक्रूझ हे मृत झाले असून, सुनील कांता पांडे (वय 46) रा भाईंदर, दयाशंकर राजेंद्र शेठ (वय 32) रा. भाईंदर, संदीप राजेंद्र प्रसाद उपाध्याय (वय 38 )रा. नालासोपारा हे गंभीर जखमी झाले असून, कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडी नदीत कोसळली, परंतु दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने पूर ओसरला होता, अन्यथा गाडी पुरात वाहून गेली असती. दरम्यान गाडीवर प्रेस लिहिले आहेत, त्यामुळे संबंधित व्यक्ती पैकी कोणी पत्रकार असण्याची शक्यता आहे.