शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

तलासरीतील सुरुंग स्फोटांनी गाठली उच्चतम पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:42 IST

महसूल यंत्रणा ठिम्मच; दोन लाख घेणारे झारीतील शुक्राचार्य कोण?

- सुरेश काटेतलासरी : पावसाळा सुरू झाला की तलासरी परिसरातील खदानी बंद होतात त्यामुळे यंदा पावसाळा सुरू झाला असल्याने पण म्हणावा इतका पडत नसल्याने खदानी मालकांनी पाऊस सुरू होण्याअगोदर खदाणीतून मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन सुरू केले आहे. पावसाळ्यात खदानी बंद होत असल्याने व दगडाला मागणी मोठी असल्याने पावसा अगोदर मोठ्या प्रमाणात दगड काढण्यासाठी प्रचंड क्षमतेचे सुरुंग स्फोट केले जात आहेत, या मनमानी सुरुंग स्फोटाकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.तलासरी भागातील उधवा , करजगाव या गावात वैध बरोबर अवैध खदानी मोठ्या प्रमाणात आहेत. राजकीय व शासकीय आशीर्वाद घेऊन त्या सुरू आहेत.त्यांना महसूल विभागाने परवानगी दिली आहे ना वनखात्याने दगड उत्खनन करताना स्फोटाचा वापर करून नये, असा स्पष्ट निर्देश असतांना तलासरी महसूल विभाग पालघरचे खनिकर्म अधिकारी, खदानीवाले सुरुंग स्फोट करून दगड उत्खनन करू शकतात, असे सांगतात. पण तसे आदेशात नमूद करत नसल्याने, खदानीतील सुरुंग वापराबाबत शंका निर्माण होत आहे.राजकीय व शासकीय आशीर्वाद घेऊन सुरू असलेल्या खदानी मालकांची या भागात दहशत मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या बाबतीत तक्रार दाखल करायला कोणी तयार होत नाही, या खदानीबाबत व त्यात केल्या जाणाऱ्या स्फोटबाबत तलासरी पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य यांनी कलेक्टर ते प्रांत, तहसीलदारपर्यंत तक्र ार केल्या पण त्यांच्या तक्र ारीची दखल घेण्यात आली नाहीकाही दिवसांपूर्वी करजगाव येथील खदानी मालकाने दगड उत्खनन करण्यासाठी केलेल्या सुरुंग स्फोटाने अख्खे करजगाव हादरले. लोकांना काही वेळ भूकंप झाला असे वाटले, पण त्यांची तक्र ार दाखल करण्याची हिंमत झाली नाही. स्फोट करताना किती प्रमाणात स्फोट करावा असे काही बंधन नसल्याने, मनमानी पद्धतीने स्फोट करण्यात येत आहेत. या स्फोटांनी लोकांच्या घरांना तडे जात आहेत, पाण्याची पातळी खोल जात आहे, तलासरी तालुका हा दुष्कळग्रस्त तालुका घोषित करण्यात आला. उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी काही गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. तालुक्यात मुबलक असलेला पाणी साठा खदानीतील स्फोटाने खोल जाऊ लागला आहे.शासन दुष्काळग्रस्त तालुका म्हणून अनेक योजना राबवित आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, असे असताना पाणी टंचाईला, व घरांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या खदाणीतील सुरुंग स्फोटबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ करून महसूल यंत्रणा या खदानी मालकांना पाठीशी घालत आहे. या मनमानी उत्खनन व सुरुंग स्फोटबाबत एका खदानी मालकाने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दरमहा यंत्रणेला दोन लाखाचा हप्ता दिला जात असल्याने कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.भूकंपाने झालेल्या नुकसानीत पडते आहे भरतलासरी भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत, घरांना तडे जात आहेत. या भीतीच्या सावटाखाली जनता असताना या भागातील खदानीतील सुरुंग स्फोटांनी त्यात भर घातली आहे. भूकंपाबाबत महसूल यंत्रणा निष्क्रिय आहेच. पण सुरुंगाच्या स्फोटाबाबतही ती आर्थिक फायद्यासाठी निष्क्रिय झाली असल्याने तलासरीतील जनता दहशतीखाली आहे. भूकंपाच्या नुकसानीपेक्षा याभागात सुरुंग स्फोटाने नुकसान जास्त होत आहे. पण यंत्रणा आपल्या आर्थिक फायद्यासाठी भूकंपाच्या नावावर ते खपवित आहे अन् जनता कारवाईची वाट पाहत आहे.