शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

येथे गुन्ह्याऐवजी दिला जातो मिसिंग दाखला; कमी गुन्हे दिसण्यासाठी तुळींज पोलिसांची शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 23:17 IST

मोबाइल पळवला तरी गुन्हा नाही

मंगेश कराळेनालासोपारा : रोजच्या रोज दाखल होणारे गुन्हे कमी दाखवण्यासाठी नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. मॉर्निंग वॉक, कामावर जाताना, वाहनातून तसेच रस्त्याने चालत असताना चोरट्याने मोबाइल पळवला नेला तर गुन्हा दाखल न करता प्रॉपर्टी मिसिंग दाखला देऊन फिर्यादीची बोळवण केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. जर कोणाचा मोबाइल खेचून नेला तर कायद्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतांना तक्रारदाराला गुन्हा दाखल होत नसल्याचे कारण देत मिसिंग दाखला दिला जात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नालासोपारा शहराची दोन पोलीस ठाण्यामध्ये विभागणी करून पश्चिमेसाठी नालासोपारा तर पूर्वेसाठी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, तुटपुंज्या पोलीस बळावर तुळींज पोलिसांच्या हद्दीमधील गुन्हेगारीचा ग्राफ दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून त्यावर अंकुश लावण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले आहे.

२०१९ वर्षात तुळींज पोलीस ठाण्यात ३० आॅक्टोबर पर्यंत १२२४ गुन्हे दाखल झाले आहेत. हा आकडा वाढू नये म्हणून अनेक महिन्यांपासून गुन्हा न दाखल करता तुळींज पोलीस बिनधास्तपणे फिर्यादीना मिसिंग दाखला देत आहेत. काही कामचुकार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून दाखला देत असल्याचेही बोलले जात आहे.

बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेचा मोबाइल चोरट्याने पळवला. त्या महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पण, गुन्हा दाखल होणार नाही असे सांगत संबंधित महिलेला मिसिंग दाखला दिला आहे. पूर्वेकडील परिसरात दिवसाला अंदाजे असे दोन ते तीन प्रकार घडत असून यावर अंकुश बसवण्यात पोलीस अपयशी होत असताना गुन्हे सुद्धा दाखल होत नसल्याने नागरिकांमध्ये याची चर्चा सुरू आहे. लवकरच काही त्रस्त नागरिक पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची भेट घेणार असल्याचेही कळते.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांना विचारले असता, काही अधिकारी तसेच कर्मचारी असे काही प्रकार करत असल्याने त्यांना सक्त ताकीद दिली आहे. पुन्हा असे काही निदर्शनास आल्यावर संबंधित अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.तुळींज पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ : तुळींज पोलीस ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ७ सहायक पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक आणि १३० पोलीस कर्मचारी असे एकूण मनुष्यबळ आहे. तर बिट मार्शल योजनेअंतर्गत ३ बिट मार्शल पोलीस तुळींज पोलीस ठाण्याच्या ताफ्यात आहे.माझ पत्नी मार्केटमध्ये गेली असता, तिथेच तिचा मोबाइल चोरट्याने पळवला. ती पोलीस ठाण्यात गेल्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी मोबाइल कुठेतरी पडून गहाळ झाल्याचा प्रॉपर्टी मिसिंगचा दाखला देण्यात आला होता. - गौरव मानालाल जैन, फिर्यादीविरारमध्येही असाच प्रकारकाही दिवसांपूर्वी विरार पोलीस ठाण्यात दाखल होणाºया गुन्ह्यांची संख्या गेल्या वर्षीच्या गुन्ह्यांपेक्षा कमी असल्याने पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना संशय आल्याने विरारच्या पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांना प्रॉपर्टी मिसिंगचे दप्तर चेक करायला सांगितले होते तसेच गुन्ह्यांची व्यविस्थत माहिती घेण्याचेही आदेश दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

टॅग्स :Policeपोलिस