शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नालासोपाऱ्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 5, 2016 00:50 IST

नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे

शशी करपे, वसईनालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील लोक दिवसरात्र अक्षरश: भटकंती करीत आहेत. या टंचाईच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे या भागात पाणीविक्रीचा नवा धंदा अनेकांनी सुुरू केला असून येथील गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.नालासोपारा शहराचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने येथील लोक नागरी समस्यांनी ग्रासले आहेत. शहरात वन आणि आदिवासींच्या जागा हडप करून बेकायदा चाळी आणि झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या आहेत. नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, गवराईपाडा, बिलालपाडा, धानीवबाग यासह वसई पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली परिसर झोपडपट्ट्या आणि बेकायदा चाळीने वेढला गेला आहे. या परिसरात गोरगरीब लोकांनी हक्काची घरे विकत घेतली आहेत. मात्र, येथील किमान लाखभर लोकसंख्या असलेला परिसर अनधिकृत असल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवणे डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यातही माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही भागांत पाणीपुरवठा केला गेला आहे. तसेच अगदी दाटीवाटीने वसलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाइपलाइन टाकणेही अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा अतिशय कमी असल्याने येथील लोकांना बाराही महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या गळक्या व्हॉल्व्हमधील पाणी भरण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतात. परिस्थिती इतकी भीषण आहे की, लोक गटारांतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी भरताना दिसतात. या भागात अनेकांनी आता पाणी विकण्याचा धंदा सुुरू केला आहे. टँकरने पाणी मागवून सिंटेक्सच्या टाकीत भरून ठेवले जाते. त्यानंतर, लोकांना वीस लीटर पाणी पाच रुपये दराने विकले जाते. पिण्यासाठी लोकांना आता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कित्येक ठिकाणी पाणीविक्रेते पाहावयास मिळतात. सध्या वसई-विरार परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठमोठ्या इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. सध्या पाणीपुरवठा मर्यादित असल्याने पालिकेने नव्या वसाहतींना नळकनेक्शन देणे बंद केले आहे. उलट, चोरटी कनेक्शन्स शोधून ती तोडण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. जादा पाणी मिळण्यास अजून पाच-सहा महिने लागतील. त्यानंतर, पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. पण, तोपर्यंत लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.