शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

नालासोपाऱ्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 5, 2016 00:50 IST

नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे

शशी करपे, वसईनालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील लोक दिवसरात्र अक्षरश: भटकंती करीत आहेत. या टंचाईच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे या भागात पाणीविक्रीचा नवा धंदा अनेकांनी सुुरू केला असून येथील गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.नालासोपारा शहराचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने येथील लोक नागरी समस्यांनी ग्रासले आहेत. शहरात वन आणि आदिवासींच्या जागा हडप करून बेकायदा चाळी आणि झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या आहेत. नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, गवराईपाडा, बिलालपाडा, धानीवबाग यासह वसई पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली परिसर झोपडपट्ट्या आणि बेकायदा चाळीने वेढला गेला आहे. या परिसरात गोरगरीब लोकांनी हक्काची घरे विकत घेतली आहेत. मात्र, येथील किमान लाखभर लोकसंख्या असलेला परिसर अनधिकृत असल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवणे डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यातही माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही भागांत पाणीपुरवठा केला गेला आहे. तसेच अगदी दाटीवाटीने वसलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाइपलाइन टाकणेही अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा अतिशय कमी असल्याने येथील लोकांना बाराही महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या गळक्या व्हॉल्व्हमधील पाणी भरण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतात. परिस्थिती इतकी भीषण आहे की, लोक गटारांतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी भरताना दिसतात. या भागात अनेकांनी आता पाणी विकण्याचा धंदा सुुरू केला आहे. टँकरने पाणी मागवून सिंटेक्सच्या टाकीत भरून ठेवले जाते. त्यानंतर, लोकांना वीस लीटर पाणी पाच रुपये दराने विकले जाते. पिण्यासाठी लोकांना आता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कित्येक ठिकाणी पाणीविक्रेते पाहावयास मिळतात. सध्या वसई-विरार परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठमोठ्या इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. सध्या पाणीपुरवठा मर्यादित असल्याने पालिकेने नव्या वसाहतींना नळकनेक्शन देणे बंद केले आहे. उलट, चोरटी कनेक्शन्स शोधून ती तोडण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. जादा पाणी मिळण्यास अजून पाच-सहा महिने लागतील. त्यानंतर, पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. पण, तोपर्यंत लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.