शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:30 IST

सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो.

बोर्डी/कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यांत शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. धामणी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून सूर्या नदीत १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील सरासरी पर्जन्यमान पातळी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील जलस्रोत भरले आहेत. पालघर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस ६६ टक्के (८६८ मि.मी.) पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र आॅगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन रविवारी ३० आॅगस्टपर्यंत सरासरी ११८९ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र संततधार कायम होती. जून ते आजतागायत १९५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टअखेर २ हजार मिलिमीटरचा टप्पा लवकरच गाठला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोर्डीलगत असलेले अस्वाली वगळता जिल्ह्यातील धरणे भरून वाहत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कासाजवळील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व पाचही दरवाजे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर गाठली आहे, तर धरणातील पाणीसाठा २८५.३१० दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे सर्व दरवाजे ५० सेमीपर्यंत उघडले असून धरणांतून ९ हजार ६६ क्युसेक पाणी सोडले आहे, तर त्याखालील कवडास धरण हे महिनाभरापूर्वीच पूर्ण भरले आहे. त्यामुळे एकूण १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा निसर्ग सूर्या नदीत होत असून सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धरण पूर्ण भरल्याने पालघर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात आज ८४ मि.मी. पाऊस पडला आहे. तर आतापर्र्यंत २२९६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.तुफान पावसामुळे विजेचे खांब पडलेजव्हार : जव्हार, मोखाडा, डहाणू तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे. वाºयासह पाऊस पडत असल्यामुळे डहाणूहून जव्हार-मोखाड्यात वीजपुरवठा करणाºया हायटेन्शन वायरचे ५ लोखंडी खांब डहाणू भागात पडल्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजेपासून जव्हार-मोखाडा भागाची वीज रात्री उशिरापर्यंत खंडित झाली होती.दरवर्षी पावसाळ्यात जव्हार भागात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस पडत असतो. रविवारी जव्हार तालुक्यात ३३६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. वीजपुरवठा हा डहाणू - गंजाड- सूर्यानगर व सूर्यानगर ते जव्हार असा ७८ कि.मी. दुरून जव्हार मोखाडा भागात वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठा करणारी सर्व यंत्रणाही खूप जुन्या व जीर्ण झाल्या असून, थोडाही पाऊसवारा आला की, वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथे विजेची समस्या आजही कायम आहे.विक्रमगड : नदी-नाल्यांना पूरविक्रमगड : तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्यांवरून पाणी वाहून जाऊ लागले आहे. यामुळे अनेक गावांचा काही काळ तालुक्याशी व विक्रमगड शहराशी संपर्क तुटला होता.रविवारी सकाळी विक्रमगड-मनोर मार्गावरील पाचमाड पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि मनोर व पालघरचा संपर्क काही काळ तुटला होता तसेच विक्रमगड भागातील छोटे पूल काही वेळ पाण्याखाली गेले होते. काही काळ वाहतूक खोळंबली होती. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते.तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे दोन दिवसाच्या सततच्या पावसाने भरायला सुरुवात झाली असून पाऊस असाच राहिला तर हे बंधारे ओव्हरफ्लो होतील. पावसाचा जोर कायम असून तालुक्यात ३० आॅगस्ट पाऊस विक्रमगड मंडळ ६५ तर तलवाडा ५५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस