शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, डहाणू, जव्हार, विक्रमगडमध्ये संततधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:30 IST

सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो.

बोर्डी/कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यांत शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. धामणी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून सूर्या नदीत १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील सरासरी पर्जन्यमान पातळी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील जलस्रोत भरले आहेत. पालघर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस ६६ टक्के (८६८ मि.मी.) पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र आॅगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होऊन रविवारी ३० आॅगस्टपर्यंत सरासरी ११८९ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र संततधार कायम होती. जून ते आजतागायत १९५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टअखेर २ हजार मिलिमीटरचा टप्पा लवकरच गाठला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोर्डीलगत असलेले अस्वाली वगळता जिल्ह्यातील धरणे भरून वाहत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कासाजवळील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व पाचही दरवाजे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता उघडले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सातत्याने झालेल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण १०० टक्के भरले आहे. जिल्ह्यातील डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा सूर्या प्रकल्पातील धरणातून केला जातो. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण १०० टक्के भरले आहे. धरणाची पाण्याची पातळी ११८.६० मीटर गाठली आहे, तर धरणातील पाणीसाठा २८५.३१० दशलक्ष घनमीटर इतका आहे. यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे सर्व दरवाजे ५० सेमीपर्यंत उघडले असून धरणांतून ९ हजार ६६ क्युसेक पाणी सोडले आहे, तर त्याखालील कवडास धरण हे महिनाभरापूर्वीच पूर्ण भरले आहे. त्यामुळे एकूण १३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा निसर्ग सूर्या नदीत होत असून सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धरण पूर्ण भरल्याने पालघर जिल्ह्यातील उन्हाळ्यातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात आज ८४ मि.मी. पाऊस पडला आहे. तर आतापर्र्यंत २२९६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.तुफान पावसामुळे विजेचे खांब पडलेजव्हार : जव्हार, मोखाडा, डहाणू तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे. वाºयासह पाऊस पडत असल्यामुळे डहाणूहून जव्हार-मोखाड्यात वीजपुरवठा करणाºया हायटेन्शन वायरचे ५ लोखंडी खांब डहाणू भागात पडल्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजेपासून जव्हार-मोखाडा भागाची वीज रात्री उशिरापर्यंत खंडित झाली होती.दरवर्षी पावसाळ्यात जव्हार भागात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस पडत असतो. रविवारी जव्हार तालुक्यात ३३६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. वीजपुरवठा हा डहाणू - गंजाड- सूर्यानगर व सूर्यानगर ते जव्हार असा ७८ कि.मी. दुरून जव्हार मोखाडा भागात वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठा करणारी सर्व यंत्रणाही खूप जुन्या व जीर्ण झाल्या असून, थोडाही पाऊसवारा आला की, वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथे विजेची समस्या आजही कायम आहे.विक्रमगड : नदी-नाल्यांना पूरविक्रमगड : तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्यांना आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्यांवरून पाणी वाहून जाऊ लागले आहे. यामुळे अनेक गावांचा काही काळ तालुक्याशी व विक्रमगड शहराशी संपर्क तुटला होता.रविवारी सकाळी विक्रमगड-मनोर मार्गावरील पाचमाड पुलावरून पाणी वाहू लागल्याने विक्रमगड आणि मनोर व पालघरचा संपर्क काही काळ तुटला होता तसेच विक्रमगड भागातील छोटे पूल काही वेळ पाण्याखाली गेले होते. काही काळ वाहतूक खोळंबली होती. तसेच दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते.तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे दोन दिवसाच्या सततच्या पावसाने भरायला सुरुवात झाली असून पाऊस असाच राहिला तर हे बंधारे ओव्हरफ्लो होतील. पावसाचा जोर कायम असून तालुक्यात ३० आॅगस्ट पाऊस विक्रमगड मंडळ ६५ तर तलवाडा ५५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस