शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:33 IST

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे.

वसई  - भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही. अशा अनेक मागण्या घेऊन येत्या शुक्र वारी (दि.८) पालघर जिल्हा आगरी सेना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. आगरी सेना नेते कैलास पाटील, आगरी सेना वसई अध्यक्ष भूपेश कडूलकर तसेच पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरसाड नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ वर सकाळी १० वाजता चक्का जाम करण्यात येणार आहे.मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक आदी परिसरात आगरी-कोळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. त्यावेळी मोठे मन करून त्यांनी विकासाला जागा दिलेल्या आहेत. पण आता पुन्हा मोठ्या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. मात्र त्यांना कवडीमोल भावाने मोबदला दिला जातो. त्यांना रोजगार दिला जात नाही. मच्छीमारांना नुकसान भरपाई, वाढीव घरपट्टी, नोक-यांमध्ये आरक्षण, वाढीव वीजबिले, पाणी प्रश्न, म्हाडाचा रखडलेला गृहप्रकल्प, डबघाईस आलेला रेती व्यवसाय, पालिका क्षेत्रातील बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष, माहितीच्या अधिकाराची पायमल्ली, नारंगी जवळचा नियोजीत उड्डाणपूल, महामार्गानजीक नवीन पोलिस चौकी सुरु करणे आदी मागण्यांसाठी आता आगरी समाज एकवटून आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहे. त्यासाठी पालघर जिल्हा आगरी सेनेने राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोकोची हाक दिली आहे.या रास्ता रोकोत पन्नास हजाराहून अधिक आगरी समाजबांधव सहभागी होणार आहेत.पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमीपुत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांमध्ये आरक्षण मिळावे अशी आमची मागणी असल्याचे आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी सांगितले. सध्या ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामुळे दोन महिने मच्छिमारी बंद ठेवावी लागली आहे, त्याचा मोठा फटका मच्छिमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे, त्यामुळे घरपट्टीत वाढ करण्यात येऊ नये. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन,मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतक-यांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामूळे वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यात सुधारणा करून दिलासा देण्यात यावा. पाणि जोडणीसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते, ती थांबवावी. बांधकाम व्यावसायिकांकडूनही फूटामागे पैसे लाटले जात आहेत, याची चौकशी करण्यात यावी. पालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे १९८७ पासून बोळींज येथील म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. घोडबंदर ब्रीजजवळ ड्रेजरने रेती उत्खनन केले जाते, मात्र स्थानिक भूमीपूत्रांना गावाजवळील खाडीत रेती उपसा परवानगी दिली जात नाही. ती द्यावी आदी मागण्या केल्या गेल्या आहेत.अनेक वर्षांपासून मागण्या आहेत प्रलंबितपालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहत असताना,पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.वसईत वेट लॅण्ड झोन उठवून तेथे रेसिडेंटल झोन होत आहे. त्यामुळे समूद्राचे खारे पाणी गावात घुसून पूराचा धोका निर्माण होऊ लागला आहे.नारंगी गावाजवळ उड्डाणपूल बांधण्यात यावा ,तसेच राष्ट्रीय महामार्गालगत शिरसाड-भाताणे-चांदिप परिसरासाठी स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्यात यावी अशा विविध मागण्या असल्याचे जनार्दन पाटील यांनी सांगितले.स्थानिक भूमिपूत्रांच्या अस्तीत्वाच्या लढाईसाठी, मागण्यांसाठी आगरी सेनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करण्यात येणार आहे. पन्नास हजारांहून अधिक भूमिपूत्र या लढ्याला पाठींबा दर्शविणार आहेत. सत्ताधा-यांना याची नोंद घ्यावीच लागेल.- जनार्दन (मामा) पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा आगरी सेना.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार