शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

प्रसूतीनंतर राहून गेला मातेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:03 IST

वसई येथील पालिका प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा राहून गेल्याची घटना समोर आली आहे.

वसई : येथील पालिका प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या गर्भाशयात कापसाचा बोळा राहून गेल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर ४० दिवसांनी महिलेला वेदना झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे महापालिकेच्या डॉक्टरांचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नालासोपारा पश्चिमेला रॉयल काऊंटी सोसायटीत राहणाऱ्या शमा शेख या दिव्यांग मातेच्या बाबत ही घटना घडली. तिचे पतीही दिव्यांग आहेत. शब्बीर यांनी पत्नी शमा यांना वसई-विरार महापालिकेच्या तुळींज येथील माता बाल संगोपन केंद्रात २५ एप्रिल २०१८ रोजी प्रसुतीसाठी दाखल केले. त्या प्रसूत झाल्यानंतर ३० एप्रिलला त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या ओटीपोटात कळा येऊ लागल्या. ६ जून ला त्या मुळव्याधीवर उपचार करण्यासाठी दंडवते हॉस्पिटल गेल्या होत्या. त्यावेळी तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांनी सोनोग्राफी केली असता त्यांच्या ओटीपोटात कापसाचा बोळा असल्याचे निष्पन्न झाले.झालेल्या प्रकारामुळे पालिकेच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शब्बीर शेख यांना पोलीस ठाण्यात अनेक फेºया देखील मारल्या . ते नालासोपारा पश्चिमेला राहत असल्याने त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी धाव घेतली. त्यांची फिर्याद ठाणे अंमलदाराने न घेता मोठ्या साहेबांची वाट पहा, असे सांगून त्यांना ताटकळत ठेवले. त्यानंतर आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांची तक्र ार घेण्यास नकार दिला व त्यांना नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. या सर्व गोष्टींमुळे शेख यांना मानसिक त्रास देखील सहन करावा लागला. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात शेख यांची तक्र ार अखेर नोंदविली. मात्र त्यावर अद्याप देखील कोणती कारवाई करण्यात आलेली नाही .४० दिवसांनी शमा शेख आमच्याकडे आल्या आम्ही त्यांच्यावर उपचार केले. त्यात आमची काहीही चूक नसून तो गोळा कसा त्यांच्या पोटात राहिला हे आम्हांला ठाऊक नाही. असा खुलासा पालिकेच्या डॉक्टर गायत्री गोरख यांनी केला आहे, तर संबंधित डॉक्टरवर कोणती कारवाई होणार हे ही सांगण्यास त्यांनी नकार दिला.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गायनॉकॉलॉजिस्टकडून अशा चुका गेल्या काही वर्षांपासून घडत नाहीत. कापूस हा लगेच विघटीत होत नाही तो कितेक वर्षे रुग्णाच्या पोटात राहू शकतो. जगभरात अनेक डॉक्टरांद्वारे अशा चुका झाल्याच्या अनेक घटना आहेत.असा चुका या एक्सरे किंवा सोनोग्राफीद्वारेच शोधल्या जाऊ शकतात. अशा घटनांमध्ये रु ग्णांना फार पिडा होते आणि असा प्रकार कधीकधी जीवावर देखील बेतू शकतो.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्यVasai Virarवसई विरार