शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

संडे स्पेशल मुलाखत - फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:38 IST

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे.

मुरलीधर भवार

केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेची कारवाई, फेरीवाले व अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंध, व्यवसायासाठी जागेवरून फेरीवाल्यांमध्ये झालेली हाणामारी, फेरीवाला धोरण हे विषय एकमेकांशी संबंधित आहेत. हाणामारीनंतर राज्यमंत्री व डोंबिवलीचे नवनिर्वाचित भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घ्या, असा सल्ला दिला. त्यामुळे बोडके यांनी रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका काय करत आहे, यासंदर्भात आयुक्तांशी साधलेला संवाद...

फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी का सुटत नाही?सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रेल्वेस्थानक परिसराच्या १५० मीटर, तर शाळा-कॉलेजपासून १०० मीटर अंतराबाहेर फेरीवाल्यांनी व्यवसाय केला पाहिजे. मात्र, हे निकष न पाळणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेचे पथक कारवाई करते. आता या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका प्रयत्नच करीत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत चालढकल होत असल्याचा आरोप होत आहे? तो आपल्याला मान्य आहे का?महापालिकेकडून फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, फेरीवाल्यांना १ बाय १ मीटरची जागा रस्त्याच्या कडेला दिली जाणार आहे. रस्त्यावर त्यासाठी पांढरे पट्टे मारण्यात येतील. फेरीवाला धोरण ठरविणाºया समितीचा मीच अध्यक्ष आहे. त्यामुळे धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेला मी गती दिली आहे. त्यात चालढकल होत असल्याचा आरोप हा मला मान्य नाही. हा आरोपच मुळात चुकीचा आहे.फेरीवाल्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार आहे?महापालिका हद्दीतील १२२ प्रभाग हे १० प्रभाग क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहेत. या १० प्रभाग क्षेत्रांनुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार, फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी केली होती. त्यानंतर, त्यांच्या नावाची तपासणी केली गेली. मात्र, सर्वेक्षणयादीतील काही फेरीवाले त्यांच्या मूळ जागी आढळले नाहीत. त्यामुळे फेरतपासणीची प्रक्रिया सुरू आहे. फेरतपासणीत जे आढळून आले नाहीत, अशांचा विषय बाजूला ठेवून जे आढळतील, त्यांना पट्टे मारलेल्या ठिकाणी व्यवसायासाठी जागा दिली जाईल. हा निर्णय येत्या १५ दिवसांत घेतला जाईल. फेरीवाल्यांना जागा देताना नागरिक व वाहतुकीस अडथळा होणार नाही, हे पाहिले जाईल. तसेच न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घेऊन महापालिका कर्तव्य पार पाडत आहे.जे अधिकारी फेरीवाल्यांना पाठीशी घालतात अथवा कारवाई करीत नाही, अशा अधिकाऱ्यांविरोधात तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्याविरोधात नक्कीच कारवाई केली जाईल. त्याची हयगय केली जाणार नाही. - गोविंद बोडके 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणेhawkersफेरीवाले