शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

गुंजाळकरचा ताबा वालिव पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:06 IST

चौकशी करणार : आज न्यायालयापुढे हजर करणार

वसई : माहितीच्या अधिकाराचा दुरु पयोग करीत वसईतील विविध बांधकामांची माहिती घेऊन त्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांकडे कथितपणे खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे वसई- विरार जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांना वसई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्हयात तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती मात्र, सोमवारी झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांकडे दिला आहे.

सोमवार दि.१५ आॅक्टोबर रोजी गुंजाळकर यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपली होती. त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, वसई न्यायालयात आधीच वालिव पोलिसांनी मागणी करताच न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांना दिला असल्याची माहिती वालिव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी लोकमतला दिली.

दरम्यान, गुरु वारी गुंजाळकर यांनी वसई कोर्टात शरणागती पत्करल्यावर कोर्टाने प्रथम त्यांचा ताबा वसई पोलिसांना दिला. त्यावेळी ताबा मिळताच वसई पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर शुक्र वारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत सोमवारी संपली होती.

परिणामी एका गुन्ह्यातील कोठडी संपल्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र त्याचवेळी उपस्थित वालिव पोलसांनी न्यायालयापुढे वालिव पोलिसांत दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासाकरता आम्हाला आरोपीचा ताबा मिळण्याची मागणी केली असता न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलिसांकडे सुपूर्द केला.

वालिव पोलीस आता मंगळवारी गुंजाळकर यांना रीतसर वसई न्यायालयात हजर करतील. त्यावेळी प्रत्यक्ष न्यायालय गुंजाळकर यांच्या प्रकरणात काय आदेश देत यावरुन त्यांची पुढील वाटचाल ठरणार आहे. मागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या चौकशीतुन अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.लागोपाठ घडामोडींमुळे वसईतील राजकारण तापलेमागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. एकूणच या सर्व लागोपाठ घडामोडीमुळे वसईत सद्या तरी राजकारण चांगलेच तापले असून गुंजाळकर यांच्या अटकसत्र व तीन दिवसीय पोलीस कोठडी व आता वालिव पोलिसांकडे ताबा आणि त्यांनतर पुन्हा पोलीस कोठडी या मुळे त्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून पुढील कायद्याची क्लिष्ट प्रक्रि या व गुन्हा व त्याच्या शिक्षेची तीव्रता पाहता त्यांचा यापुढे जामीन होणे कठीण असल्याची वंदिता असून आता वसईतील राजकारण नेमके कुठल्या दिशेने जाईल हे बघणे मात्र रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी