शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

गुंजाळकरचा ताबा वालिव पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:06 IST

चौकशी करणार : आज न्यायालयापुढे हजर करणार

वसई : माहितीच्या अधिकाराचा दुरु पयोग करीत वसईतील विविध बांधकामांची माहिती घेऊन त्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांकडे कथितपणे खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे वसई- विरार जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांना वसई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्हयात तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती मात्र, सोमवारी झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांकडे दिला आहे.

सोमवार दि.१५ आॅक्टोबर रोजी गुंजाळकर यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपली होती. त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, वसई न्यायालयात आधीच वालिव पोलिसांनी मागणी करताच न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलसांना दिला असल्याची माहिती वालिव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी लोकमतला दिली.

दरम्यान, गुरु वारी गुंजाळकर यांनी वसई कोर्टात शरणागती पत्करल्यावर कोर्टाने प्रथम त्यांचा ताबा वसई पोलिसांना दिला. त्यावेळी ताबा मिळताच वसई पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर शुक्र वारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत सोमवारी संपली होती.

परिणामी एका गुन्ह्यातील कोठडी संपल्यामुळे न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र त्याचवेळी उपस्थित वालिव पोलसांनी न्यायालयापुढे वालिव पोलिसांत दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासाकरता आम्हाला आरोपीचा ताबा मिळण्याची मागणी केली असता न्यायालयाने गुंजाळकर यांचा ताबा वालिव पोलिसांकडे सुपूर्द केला.

वालिव पोलीस आता मंगळवारी गुंजाळकर यांना रीतसर वसई न्यायालयात हजर करतील. त्यावेळी प्रत्यक्ष न्यायालय गुंजाळकर यांच्या प्रकरणात काय आदेश देत यावरुन त्यांची पुढील वाटचाल ठरणार आहे. मागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या चौकशीतुन अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता आहे.लागोपाठ घडामोडींमुळे वसईतील राजकारण तापलेमागील महिन्यात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने गुंजाळकर यांना चार आठवड्यात पोलिसांपुढे हजर होण्याचे निर्देश दिले होते. एकूणच या सर्व लागोपाठ घडामोडीमुळे वसईत सद्या तरी राजकारण चांगलेच तापले असून गुंजाळकर यांच्या अटकसत्र व तीन दिवसीय पोलीस कोठडी व आता वालिव पोलिसांकडे ताबा आणि त्यांनतर पुन्हा पोलीस कोठडी या मुळे त्यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून पुढील कायद्याची क्लिष्ट प्रक्रि या व गुन्हा व त्याच्या शिक्षेची तीव्रता पाहता त्यांचा यापुढे जामीन होणे कठीण असल्याची वंदिता असून आता वसईतील राजकारण नेमके कुठल्या दिशेने जाईल हे बघणे मात्र रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी