शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी, नोटबंदी, बेरोजगारीचा फटका गावितांना बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:26 IST

मतदार त्रासले; आश्वासने हवेत विरल्याने फिरवली पाठ

वसई : नोटबंदी, जीएसटी यामुळे बंद पडलेले उद्योग व्यवसाय , वाढलेली बेरोजगारी परिणामी देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती याचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष फटका पालघर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या लघू उद्योकाना बसला. त्यातच विकासाच्या नावाने मारलेली खोटी बोंब यामुळे केवळ पालघरच मतदारसंघातच नाही तर संपूर्ण देशात मोदी सरकार विरोधात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. याचाच फायदा बहुजन विकास आघाडीचे रिक्षातून फिरणारे उमेदार बळीराम जाधव याना होणार आहे.शहरीकरणाच्या अपेक्षेत असलेल्या या पालघर मतदारसंघाचे नेतृत्व गेली अनेक वर्षे भाजपचे राम नाईक यांच्याकडे होते. तेंव्हा हा मतदारसंघ मुंबईतील गोरेगाव पासुन डहाणू परंत पसरलेला होता. पण निवडून येणाऱ्या खासदारानी फक्त मुंबईचा विकास केला. पण पालघर कडे लक्षच दिलं नाही. परिणामी मतदारसंघ एकच असुनही पालघर, डहाणू आणि वसई तालुके विकासापासून दूर राहिले.येथील ग्रामीण भागासाठी कोणतीही ठोस योजना भाजपचे राम नाईक यानी आणली नाही. उपनगरी रेल्वे सारखा प्रश्नही ते रेल्वे मंत्री असूनही सोडवू शकले नाही. डहाणू -शिर्डी रेल्वे मार्ग टाकणार असेही नाईक यानी सांगितले यासाठी त्याकाळी सर्व्हेसाठी कोट्यवधी रु पये खर्च केले पण पुढे या मार्गाचे काहीच झाले नाही. यामुळेच २००९ साली उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाची विभागणी होऊन पालघर मतदारसंघ निर्माण झाला. आणि पालघरच्या विकासाला खºया अर्थाने सुरु वात झाली त्यामुळे स्थानिकांना आपला उमेदवार निवडण्याची संधी मिळाली.मुंबईच्या उंबरठ्यावर असलेला हा पालघर मतदारसंघ. यामुळे शहरीकरणाची आस लाऊन बसलेला हा मतदारसंग. डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघात पसरलेला हा पालघर लोकसभा मतदारसंघ. येथील बहुतांश तरु ण नोकरी- व्यवसाय निमित्त नेहमीच मुंबईत येत जात असतात. यामुळे पालघरमध्ये सुविधा मिळाव्यात या अपेक्षेत येथील जनता विशेषता येथील तरु ण वर्ग आहे. पण विकासाची स्वप्न पहाता पहाता एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली. याचे मुख्य कारण खासदारांचे दुर्लक्ष २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वसईचे आमदार आणि बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर यानी वसईत केलेल्या विकास कामाच्या आधारेच पालघरवासियांनी बळीराम ठाकुर यांना कौल दिला होता.२०१४ च्या लोकसभा निवडणुकी नंतर सेना भाजपामध्ये वाद होऊन दोन्ही पक्ष समोरासमोर उभी ठाकली. या काळात त्यांनी एकमेकांची उणी धुणी काढली. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. हे सर्व सूरु असतानाच पालघर लोकसभा मतदारसंघतील भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले. त्यानंतरची पोट निवडणुक सर्वांनाच ठावुक आहे. त्यात गावितांना निसटता विजय मिळाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी युती होणार नाही असे सांगुन स्वबळाची भाषा सुरु केली होती. मात्र त्यांच्या अवसान घाती राजकारणामुळे शिवसैनिक दुखावले असून भाजपमधुन गवित यांना शिवसेनेने पक्षात प्रवेश देऊन त्याना उमेदवारी दिल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे.कामाच्या बाबतीत बळीराम जाधव गावितांना उजवेराजेंद्र गवित आणि बळीराम जाधव या दोघांमधील कामांचा अवाका पहिल्यास बळीराम जाधव हे नक्कीच उजवे ठरत आहे व ठरतील कारण जाधव यांच्या मागे हितेंद्र ठाकुर या नावाच्या विकासाची ताकत आहे. आणि पालघर वासियांना विकासाची गरज आहे. मागिल पाच वर्षात येथील विकास ठप्प झाला आहे. जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेला आरोग्या चा प्रश्न आ वासून उभा आहे. नोटबंदी मुळे आधीच सामन्य जनता बेजार झाली आहे. पालघर तालुका हे लघुद्योगचे केंद्र आहे. हे सारे उद्योग डबगाईला गेले आहेत. यामुळे मोदी सरकारच्या विरोधात कामगारात, सामान्य माणसामधे प्रचंड संताप आहे. हा संताप मतदार निवडणुकांमध्ये बाहेर काढेल असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरBJPभाजपा