शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राउंड रिपोर्ट - पालघरमध्ये बविआ आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष निकराचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 04:24 IST

शिट्टी चिन्हावरून रडीचा डाव सुरू। मित्रपक्षांच्या मतांकडे दोन्ही उमेदवारांचे लक्ष

हितेन नाईक

युतीच्या भांडणात शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावत भाजपकडून हिसकावून घेतलेली पालघरची जागा राखण्यासाठी त्या पक्षाची आणि राष्ट्रीय राजकारणात अस्तित्व हवे असेल, तर एक तरी खासदार हाताशी असावा, यासाठी बहुजन विकास आघाडीत (बविआ) सध्या निकराचा सत्तासंघर्ष सुरू आहे. बविआचे शिट्टी चिन्ह काढून घेण्याची खेळी खेळून शिवसेनेने रडीचा डाव खेळल्याची टीका सुरू झाली. त्यातून बविआ अपेक्षेपेक्षा आक्रमक झाली. परिणामी, कधी नव्हे एव्हढी येथील लढत अटीतटीची होऊ लागली आहे.

आदिवासीबहुल असलेला हा परिसर. सागरी, नागरी आणि डोंगरी अशा भौगोलिक स्थितीत विखुरलेल्या या लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजविण्यासाठी शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात लढत आहे. विविध प्रकल्पांविरोधात आवाज उठवणारे अपक्ष उमेदवार दत्ता करबट यांची मते कोणाला फटका देतील, यावर विजयाचे गणित ठरेल.जनमानसात चांगली प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व म्हणून राजेंद्र गवितांची ओळख असली तरी काँग्रेस ते भाजप आणि आता शिवसेनेतील त्यांचा ‘जबरदस्तीचा प्रवेश’ अजून तितकासा रुचल्याचे दिसून येत नाही. केंद्रातील सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांनी ही जागा आणि आपला खासदार त्यांना देऊन टाकला. त्यातून भाजप पदाधिकाऱ्यांनी उगारलेले राजीनामा सत्र शमले असले, तरी अंतर्गत खदखद कायम आहे. त्यामुळे एकत्र लढणे गरजेचे असल्याचे गावितांना प्रचारादरम्यान सतत सांगावे लागत आहे. दुसरीकडे ‘अबकी बार नंदुरबार’ अशी घोषणा देत गेल्याचवर्षी ज्या उमेदवाराविरोधात शिवसैनिकांनी लढत दिली, त्याच गावितांचा प्रचार करण्याची वेळ आल्याने त्याची खिल्ली उडवणाऱ्या  मतदारांना काय उत्तर द्यायचे, या संभ्रमात अजूनही शिवसैनिक आहेत. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत युतीला सत्ता मिळवून दिली, तसेच प्रयत्न पुन्हा होतील, हे गृहीत धरून बविआची आखणी सुरू आहे.

बविआकडून शिट्टी हे चिन्ह हिसकावून घेण्यात शिवसेना-भाजपला यश आले. त्यामुळे नवे रिक्षा हे चिन्ह शहरी भागातील मतदारांपर्यंत पोचवण्याची त्या पक्षाची धडपड सुरू आहे. ग्रामीण भागात बविआ म्हणजे शिट्टी हे समीकरण कायम असल्याने तेथे नवे चिन्ह पोहोचवण्याची कसरत त्या पक्षाला पार पाडावी लागेल. शिवसेनेला भाजपची आणि बविआला काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपसारख्या मित्रपक्षांची किती आणि कशी साथ मिळते, यावरच येथील राजकारणाचे गणित अवलंबून आहे.

कुपोषण निर्मूलन, रोजगार, मच्छीमारासाठी स्वतंत्र मंत्रालय, शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज वाटप, घराखालच्या जमिनीचा सातबारा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वसई पट्ट्यात सरकारी जमिनीवर वाढलेले अतिक्र मण, पाणीप्रश्न, बस ठेकेदारीत झालेला भ्रष्टाचार ह्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. - राजेंद्र गावित, शिवसेना उमेदवार

सागरी, नागरी, डोंगरी भागातील शेतकरी, मच्छीमारावर अनेक प्रकल्पांद्वारे संकटे घोंगावत असून त्यांना न्याय मिळवून देण्यात पालकमंत्री निष्प्रभ ठरले आहेत. बुलेट ट्रेनसह अनेक प्रकल्पांना आमचा विरोध आहे. स्थानिकांना नको असलेल्या प्रकल्पाना आमचा विरोध राहणार आहे. - बळीराम जाधव, बविआ उमेदवार

कळीचे मुद्देमच्छीमारांचे प्रश्न सुटलेले नसतानाच बंदराला परवानगी देण्याच्या हालचालींमुळे नाराजी आहे. त्याबाबत फक्त आश्वासने पदरात पडत असल्याची भावना आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याचा उग्र बनलेला प्रश्न आणि २९ गावे वगळण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली यामुळे शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागांत नाराजी आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019