शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाच हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:01 IST

देशातून ब्रिटिशांना हाकलून देण्याच्या ^चले जाव चळवळी दरम्यान हौतात्म्य पत्करणाºया हुतात्म्यांना आज हुतात्मास्तंभाजवळ पालकमंत्री, नगराध्यक्ष आणि पालघरवासीयांनी विनम्रपणे श्रद्धांजली वाहिली.

पालघर : देशातून ब्रिटिशांना हाकलून देण्याच्या ^चले जाव चळवळी दरम्यान हौतात्म्य पत्करणाºया हुतात्म्यांना आज हुतात्मास्तंभाजवळ पालकमंत्री, नगराध्यक्ष आणि पालघरवासीयांनी विनम्रपणे श्रद्धांजली वाहिली. या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झालीत.सातपाटी हे राष्ट्रीय चळवळीचे तालुक्यातील मोठे केंद्र असल्याने रामचंद्र पागधरे, बाबुराव पाटील, काशिनाथ पागधरे, पंडित मेहेर, तर महिला रणरागिणी मंजुळा पागधरे, तुळसा पाटील, हिरुबाई मेहेर तसेच नांदगाव मधून ह. दा. राऊत गुरुजी सोबत गोविंद गणेश ठाकूर,नरोत्तम पाटील, का.दा. मोरे, इ. क्र ांतिकारक तरुणांसह सात ते आठ हजारांचा जनसागर जमला होता.पालघर कचेरी काबीज करण्यासाठी क्रांतीकारकांचे हात शिवशिवत असल्याने चले जावं च्या घोषणांनी सारे शहर दुमदुमले होते. या दरम्यान नांदगावचे चिंतू नाना पाटील ह्यांच्याशी ब्रिटिश अधिकारी अल्मेडा यांचे भांडण झाले. ह्यावेळी इंग्रजांनी लाठीहल्ला सुरु केल्याने नांदगावच्या सेवादलाचा शाखाप्रमुख गोविंद ठाकूर ह्यांनी हातात तिरंगा हातात घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत कचेरीकडे कूच केली. त्यामुळे संतापलेल्या अल्मेडा ह्यांनी झाडलेली गोळी गोविंद ठाकूर ह्यांच्या छातीत घुसली आणि ते खाली कोसळले. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी हातातील ध्वज खाली पडू दिला नाही. यामुळे धुमश्चक्री उडाली व झालेल्या गोळीबारात नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी चे काशिनाथभाई हरी पागधरे, पालघरचे रामप्रसाद भीमशंकर तेवारी, सालवड चे सुकुर गोविंद मोरे, मुरब्याचे रामचंद्र महादेव चुरी, ह्या पाच क्र ांतीकारकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. त्यासाठी सुंदर फुलांनी हुतात्मा स्तंभ सजविण्यात आला होता. ह्या पाच हुतात्म्यांच्या रक्तात न्हाऊन निघालेला तिरंगा आज पूजनासाठी हुतात्मास्तंभाजवळ ठेवण्यात आला होता. दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी हुतात्म्यांना दिन खून के हमारे यारो न भूल जाना, या गीताद्वारे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली आली. यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वणगा, आमदार अमति घोडा, आ.पास्कल धनारे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, उपनगराध्यक्ष रईस खान, जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे,मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, तहसीलदार महेश सागर उपस्थित होते. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, हॉटेल्स, उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले होेते.>सगळ्यांनाच पडला विसरज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यांच्या हौतात्म्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा विसर नगरपालिकेला, जिल्हा परिषदेला व पालकमंत्र्यांनाही पडल्याने अन्य कुठल्याही कार्यक्र माचे आयोजन करण्यात न आल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.