शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास रेल्वेचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 23:23 IST

मुंबई शहर येणार हाकेच्या अंतरावर

पारोळ : अनेक अडचणींमुळे लटकलेले नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम अखेर रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या परवानगीअभावी उड्डाणपुलाचे काम रखडले होते. नागरी भावनांचा आदर करत तसेच दैनंदिन समस्यांचा निपटारा करण्याच्या हेतूने या उड्डाणपुलाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. तसे रेल्वेने एमएमआरडीए प्रशासनाला कळवले आहे. हे उड्डाणपुलाचे काम मार्गस्थ झाल्यास नागरिकांचा बराचसा वेळ आणि कष्ट वाचणार आहेत.

नायगाव पूर्व विभागाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वसई ते मुंबई हे अंतर कमी व्हावे यासाठी नायगाव येथे या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करता मुंबई महानगरविकास प्राधिकरणाने या पुलाच्या कामासाठी एकूण ५६ कोटी २५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०१५ मध्ये पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी दोनच वर्षात पुलाच्या बांधकामाचा कठडा तुटून पडल्याने बांधकामाच्या दर्जावरच बोट ठेवत वादंग निर्माण झाला होता. अखेर पुलाच्या बांधकामाचा दर्जा तपासून तो पुन्हा चार वर्षात निम्म्यापेक्षा अधिक पूर्ण करण्याची कसरत करण्यात आली. नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाच्या बांधकामाने वसई-विरार ते मुंबई हे अंतर तब्बल २५ किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे. साहजिकच या पुलाचा वाहतुकीला फायदा होऊन मुंबई शहर अवघ्या काही तासात गाठता येणे शक्य होणार आहे.

सद्यस्थितीत पुलाचा एक पाया नायगाव येथील दोन रेल्वे रुळांमध्ये निश्चित करण्यात आल्याने या पश्चिम रेल्वेच्या जागेत बांधकाम करण्यासाठी एमएमआरडीएला रेल्वेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीला विलंब झाला. जवळपास एप्रिल २०१९ पासून या पुलाचे बांधकाम पावसामुळे आणि परवानगीअभावी रखडले होते. पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करण्यासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी एमएमआरडीए अधिकारी आणि पश्चिम रेल्वे अधिकारी यांची संयुक्त बैठक नोव्हेंबर २०१९ मध्ये घेऊन रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली होती.नायगाव पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी महामार्गावरून जावे लागते, मात्र आता या उड्डाणपुलामुळे हा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे. यामुळे इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होणार आहे.

पुलाच्या बांधकामासाठी आ. क्षितिज ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर योग्य त्या प्रक्रिया पूर्ण होऊन पश्चिम रेल्वेने या पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. या पुलाला परवानगी दिल्याचे पश्चिम रेल्वेच्या विभागीय इंजिनिअरनी एमएमआरडीएच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर यांना पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :naigaonनायगावVasai Virarवसई विरार