शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक आंदोलनाने कामे ठप्प; दखल नाही, आंदोलकांची झाली गोची, जनता धरली गेली वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:37 IST

पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत.

मोखाडा : पालघर जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांची बदली झाल्यानंतर त्या जागी २० आॅगस्ट रोजी हजर झालेल्या अशोक पाटील यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत. मात्र या आंदोलनाला मंगळवारी दिवस होवूनही कोणताही तोडगा न निघाल्याने सर्व कामकाज ठप्प झाले असून जनता वेठीस धरली गेली आहे. पाटील यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने ग्रामसेवकांच्या या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनकर्त्यांची कोंडी झाली आहे.पाटील हे वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत याशिवाय ग्रामसेवकाची आर्थिक पिळवणूक करणे, दौरे करत असताना पैसे जमा करणे असे आरोप पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटनेने केले असून तसे पत्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दिले आहे मात्र यानंतरही कसलीच कार्यवाही यावर न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून ग्रामसेवक ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले असल्याने जिल्हाभरातील कामे रखडली आहेत. मात्र असे असतांनाही यावर तोडगा काढण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. उलटपक्षी ठाणे जिल्ह्यातील आणि काही पालघर जिल्ह्यातीलही पदाधिकारी पाटील यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामसेवकांच्या आंदोलनाविरोधात श्रमजीवीचे धरणेवाडा : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक गेल्या कित्येक दिवसांपासून सामुदायिक रजेवर गेल्यामुळे ग्रामपंचायतींचे प्रशासन ठप्प झाल्याने जनतेच्या कामांचा खोळंबा झाला आहे. या विरोधात श्रमजीवी संघटनेने आक्र मक पवित्रा घेतला असून या सर्व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले.पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक पाटील यांच्या झालेल्या नियुक्ती विरोधात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक बेमुदत सामुदायिक रजेवर गेले आहेत. पाटील हे आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामसेवकांना वेठीस धरत असल्याचे कारण सांगून ग्रामसेवकांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.तर ग्रामसेवकांच्या सामुदायिक रजेमुळे मुलांच्या शैक्षणिक दाखल्यांपासून ते गोरगरीब जनतेच्या अनेक कामांचा खेळखंडोबा झाल्याने श्रमजीवीने हा मुद्दा उचलून मंगळवारी पंचायत समितीच्या आवारात धरणे धरले. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांना देवून लेखी आश्वासनानंतर आंदोलनमागे घेण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्र ेटरी विजय जाधव यांनी केले तर आंदोलनात तालुका अध्यक्ष जानूभाउ मोहनकर, तालुका सचिव सरिता जाधव, मनोज काशिद, कामगार संघटना अध्यक्ष रवींद्र चौधरी, शेतकरी घटक प्रमुख किशोर मढवी, उपाध्यक्ष सुरेश पराड, संघटक बाळाराम पाडोसा आदींसह शेकडोंच्या संख्येने श्रमजीवी उपस्थित होते.विक्रमगड पं.स.समोर श्रमजीवीचा ठिय्याविक्रमगड : ग्रामस्तारावरून विकासाचे काम करणारी यंत्रणा म्हणजे ग्रामपंचायत परंतु या तालुक्यातील ग्रामसेवकच गेल्या २१ तारखेपासून बेमुदत रजेवर गेल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीचा विकास खुंटला आहे. या बेमुदत रजेमुळे अनेक विकास कामे खोळबली असून विद्यार्थ्यांना ही शैक्षणिक दाखल्यासाठी वाट पहावी लागत आहे असा आरोप श्रमजिवीचे जिल्हा सरचिटणीस कैलास तुबडा यांनी केला आहे.तसेच आबिवली ग्रामसेवकवर कारवाई कधी करणार, महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत टेटवाळी व सावरोली या ठिकाणी रस्ताच्या कामात मजूराना २१ रु पये ते २९ रु पयापर्यत रोजगार मिळाला असून मजूराची फसवणुक केली आहे यांना नियमा प्रमाणे मजुरी द्या या मागण्यांसाठी मंगळवारी विकमगड पंचायत समिती समोर श्रमजिवी संघटनेतर्फे ठिय्या आदोलन करण्यात आले.या मागण्या मान्य होत नाहीत. वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा श्रमजिवी संघटनेने दिला. या आंदोलनात शंकर भोये, लक्ष्मण पडवळे, रूपेश डोले, कासट ताई, व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थितहोते.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार