शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अवैध रेती उत्खननाची ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:25 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली.

बोर्डी : जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली. या कक्षाने तत्काळ दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी करून नागरिकांना लेखी किंवा तोंडी तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर चोवीस तासातच पहिली तक्र ार घोलवड गावातून दत्ता इंदुलकर यांनी नोंदविली. या तक्र ारीची दखल कक्षाने घेऊन सोमवारी म्हणजे २ जुलै रोजी डहाणू तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर तलाठी अनिल वायाळ यांनी पंचनामा केला. त्या मध्ये घोलवड ग्रामपंचायतीने शासकीय दवाखाना ते दत्त मंदिरापर्यंत पाण्याचा निचरा व्हावा याकरीता गटार बांधण्यासाठी लगतच्या समुद्रकिनाºयावरून एक ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले. शिवाय घटनास्थळी शासनाचा महसूल बुडवून उत्खनन केलेले १२ ब्रास रेतीही आढळल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत विरुद्ध कोणते पाऊल उचलले जाते या कडे लक्ष लागले आहे. शिवाय विविध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांच्या नावाखाली अवैध रेतीचे सर्रास उत्खनन केले जाते. त्या मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनाचे अधिकारी यांचे संगनमत असते.दरम्यान डहाणू किनाºयावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या मात्र दखल घेतली जात नव्हती. आजच्या कारवाईने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रेती चोरी विरुद्ध लोकमतने बातम्यांची शृंखला चालवून महसूल व पोलीस प्रशासनाला जागे केले होते. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाला हा कक्ष स्थापन करावा लागल्याचे बोलले जात आहे. आता या कक्षाकडे किती तक्रारी येतात व त्यांची कशी दखल घेतली जाते. कारवाई केव्हा व कशी होते याकडे लक्ष लागले आहे.नियंत्रण कक्षाकडून प्राप्त तक्र ारीची दखल घेत, तत्काळ तलाठ्यांना पाठवून पंचनामा करण्यात आला आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणूतक्रारीची तत्काळ दखल घेतल्याने समाधानाची भावना आहे. लवकर कारवाई झाल्यास योजनेचा उद्देश सफल होईल.- दत्ता इंदुलकर,तक्र ारदार

टॅग्स :Crimeगुन्हा