शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

गोविंदा पथके सज्ज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 5:19 AM

संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.

- राहुल वाडेकर विक्रमगड : संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़ कृष्णजन्माच्या दुसºया दिवशी फोडण्यांत येणाºया दहीहांडीसाठी गेल्या काही दिवसांपासून गोविंद पथके सतत सराव करीत आहेत़ १५ आॅगस्ट रोजी होणाºया दहीकाल्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत़ मात्र दरवर्षी कृष्णजन्म आणि दहीहांडीच्या दिवशी जमके बरसणाºया पावसाने दडी मारल्यामुळे गोविंदांमध्ये तो मंगळवारी नक्कीच बरसेल असा आशेचा किरण डोकावतो आहे. यंदा डॉल्बी, डीजे नसेल त्यामुळे किमान पावसाची सर तरी यावी अशी तिची इच्छा आहे.सोमवारी साजºया करण्यांत येणाºया दहीकाला उत्सवात जिल्ह्यातील अनेक गोविंदापथके सहभागी होत आहेत़ ही पथके विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून समित्रमंडळाच्या मार्गदर्षखाली सहभागी होत आहेत़ शहराच्या संख्येने ग्रामीण भागात गोविंदा पथकांची संख्या कमी आहे़ यंदा हा दहीकाला उत्सवालाही महागाईची झळ बसलेली आहे़ दहीहांडीसाठी लागणारी हंडी पूर्वी ५० रुपयाला मिळत होती आता तिचे दर आकारनुसार ५०० रुपयांपर्यंत भिडले आहेत. तर फळांच्या-फुलांच्या किंमतही भरमसाट झाल्या आहेत. श्रावण महिना असल्याने महिनाभर असे अनेक सण, उत्सव येत असतात व हा उपवासाचा महिना असल्याने फळांच्या व फुलांची मागणी वाढलेली आहे़ अशाही परिस्थितीत अनेक दहीकाला उत्सव मंडळांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ मात्र पावसाचा जोर कसा राहील या चिंतेत गोंविदा पथके आहेत़ कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.आजही तेवढ्याच भक्तीभावाने सण,उत्सव एकत्ररित्या जोपासले जातत़ त्याचाच एक भाग कृष्ण जन्म उत्सव,दहीहंडी हा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो. विक्रमगड व परिसरात साºया तालुक्यात जवळ जवळ १०० ते १५० मंडळे आपल्या गाव-खेडयापाडयात व शहरात बांधलेल्या हंड्या फोडून मोठा जल्लोशात आनंद व्यक्त करीत असतात़ ग्रामीण भाग असला तरी येथेही मोठया रकमेची बक्षिसे लावून दहीहांडी उत्सव साजरा न करिता सर्वांनी एकत्र जमून एकोप्याने एकच दहीहांडी बांधायची व ती फोडण्याचा चान्स सर्वांना देवून आनंदाने पारंपारिक पध्दतीनेच हा उत्सव आजही चालू आहे़तालुक्यात जवळ जवळ २०० ते ३०० हंड्या बांधल्या जातात़ या भागात जास्तीत जास्त तीन ते चार थरापर्यतच हंडयांची उंची असून सुरक्षिततेच्या कारणास्तव उंच हंड्याच बांधल्या जात नाही़ अलीकडच्या आधुनिग युगामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक विविध बदल झालेले आहेत़ त्यानुसार जरी पारपंरिक पध्दत जपली जात असली तरी त्यास आधुनिक युगाची थोडीफार का होईना सांगड घातली जातेच लग्न समारंभ,वाढदिवस,इतर कार्यक्रमांना डीजेची मोठी मागणी असते व आता ही फॅशन व प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जात असल्याने त्याची मागणीही मोठी झाली आहे़ त्यानुसार आता दहीहांडीलाही डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आज ग्रामीण भागातही पहावयास मिळते. परंतु यंदा त्यावर बंदी आहे. ग्रामीण भागातील गोविंदा मंडळे दुसºया गावातील दहीहांडया फोडण्यासाठी न जाता आप-आल्याच गावात हा उत्सव साजरा करतात़पूर्वी विक्रमगड शहरात साºया गाव-पाडयांतील जनता दहीहंडी पाहाण्यासाठी येत होती मात्र आता सर्वच गावात व खेड्यापाड्यात दहीहंडी उत्सव साजरा करत असल्याने काहीशा प्रमााणात विक्रमगड शहरातील गर्दी ओसरु लागली आहे़काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मंगळवारी अशीच परिस्थिती राहाण्याची शक्यता असल्याने या दिवशी मिळेल त्या घरातून पाण्याचा वर्षाव केला जातो हंड्या सजविण्यासाठी मंडळ खबरदारीची भूमिका घेत असतात. पोलिसांनीही हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सूचना केल्या आहेत़