शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सुक्या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 23:44 IST

सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे. 

- राहुल वाडेकरविक्रमगड - सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे. मांसाहारी नागरिंकांना मासेमारी बंदीच्या पावसाळयाच्या कालावधीत हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदी करण्यासाठी विक्रमगडच्या आठवडे बाजारामध्ये गर्दी होऊ लागल्याने बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहे. पावसाळा आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजू खेडया पाडयातील शेतकरी वर्ग शेतीपूर्व कामाला लागतो़त्यामुळे त्याला पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहट (खरेदी) करण्यास शेतीकामांमुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे तो पावसाळयापूर्वीच तीन ते चार महिने पुरेल असा मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतो. चार महिने या वस्तुंचा आस्वाद घेत असतो, पावसाळया आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्याच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे तसेच राब-राबणीची सुरु केली आहे. काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतक-यांनी, अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे़ प्रत्येक गाव-पाडयांमध्ये भरणा-या आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतक-यांची झुंबड उडतांना दिसत आहे़ मात्र महागाईचा भस्मासूर डोक्यावर मांडरत असतांनाही खरेदी मात्र केली जात आहे़ कारण चार महिनें पाऊस चालू झाल्यावर येथे भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरीता अडचणी निर्माण होत असतात ग्रामीण भागात पावसाळयात पाहीजे ती वस्तू मिळत नसते.पावसाळयाच्या जीवनावश्यक वस्तंूबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोदारपणे या महिन्यात सुरु असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असतो.सुक्या मासळीलाच ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात़ सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदीविध भागातून मावरे विक्रेत्या महिला खास करुन खत्तलवाडीहुन सुके खारे घेऊन विक्रमगड व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा, उपराळे, भोपोली आदी खेडया पाडयात गावात आठवडी बाजारात येऊन आपली दुकाने थाटत असल्याने अगर इतर दिवशीही डोक्यावर टोपले घेऊन गावो गावी फिरत असल्याने मावरे खरेदीकरण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे खेडयापाडयातील ग्राहकांची, महिलांची एकच झुंबड उडत आहे़मावर ही झाली यंदा महागगेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही (मावरा) बसला आहे़ बोंबील शेकडयामागे शंभर ते दिडशे रुपये वाढलेले आहेत. तर बांगडा, आंबडकाड, मांदेली, लोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले आहेत़ सुक्या मासळीचे (मावºयाचे) भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळयात सुकी मासळीही ग्रामीण भागातील शेतक-यांची मुखत्वे येथील खेडया-पाडयातील आदिवासींची गरज असते.

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार