शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सुक्या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 23:44 IST

सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे. 

- राहुल वाडेकरविक्रमगड - सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे. मांसाहारी नागरिंकांना मासेमारी बंदीच्या पावसाळयाच्या कालावधीत हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदी करण्यासाठी विक्रमगडच्या आठवडे बाजारामध्ये गर्दी होऊ लागल्याने बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहे. पावसाळा आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजू खेडया पाडयातील शेतकरी वर्ग शेतीपूर्व कामाला लागतो़त्यामुळे त्याला पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहट (खरेदी) करण्यास शेतीकामांमुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे तो पावसाळयापूर्वीच तीन ते चार महिने पुरेल असा मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतो. चार महिने या वस्तुंचा आस्वाद घेत असतो, पावसाळया आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्याच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे तसेच राब-राबणीची सुरु केली आहे. काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतक-यांनी, अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे़ प्रत्येक गाव-पाडयांमध्ये भरणा-या आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतक-यांची झुंबड उडतांना दिसत आहे़ मात्र महागाईचा भस्मासूर डोक्यावर मांडरत असतांनाही खरेदी मात्र केली जात आहे़ कारण चार महिनें पाऊस चालू झाल्यावर येथे भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरीता अडचणी निर्माण होत असतात ग्रामीण भागात पावसाळयात पाहीजे ती वस्तू मिळत नसते.पावसाळयाच्या जीवनावश्यक वस्तंूबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोदारपणे या महिन्यात सुरु असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असतो.सुक्या मासळीलाच ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात़ सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदीविध भागातून मावरे विक्रेत्या महिला खास करुन खत्तलवाडीहुन सुके खारे घेऊन विक्रमगड व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा, उपराळे, भोपोली आदी खेडया पाडयात गावात आठवडी बाजारात येऊन आपली दुकाने थाटत असल्याने अगर इतर दिवशीही डोक्यावर टोपले घेऊन गावो गावी फिरत असल्याने मावरे खरेदीकरण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे खेडयापाडयातील ग्राहकांची, महिलांची एकच झुंबड उडत आहे़मावर ही झाली यंदा महागगेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही (मावरा) बसला आहे़ बोंबील शेकडयामागे शंभर ते दिडशे रुपये वाढलेले आहेत. तर बांगडा, आंबडकाड, मांदेली, लोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले आहेत़ सुक्या मासळीचे (मावºयाचे) भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळयात सुकी मासळीही ग्रामीण भागातील शेतक-यांची मुखत्वे येथील खेडया-पाडयातील आदिवासींची गरज असते.

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार