शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने तलासरीला अच्छे दिन?

By admin | Updated: May 18, 2017 03:52 IST

गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेला भिडलेला महाराष्ट्राचा शेवटचा आदिवासी तलासरी तालुका. तालुक्याची लोकसंख्या एक लाख चोपन्न हजार.

- सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्क

तलासरी : गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीच्या सीमेला भिडलेला महाराष्ट्राचा शेवटचा आदिवासी तलासरी तालुका. तालुक्याची लोकसंख्या एक लाख चोपन्न हजार. आदिवासी तालुका असल्याने त्याकडे अधिकाऱ्यांबरोबर राजकारण्यांच्या व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तो विकासापासून दूरच आहे. अशा या तालुक्याला राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी भेट देणार आहेत. या भेटीत ते तालुक्यातील जल शिवार, अंगणवाडी, शेततळी यांची पाहणी करून तलासरी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यां बरोबर आढावा बैठक घेणार आहेत, मुख्यमंत्री तलासरीत येणार असल्याने कधी नव्हे ते तलासरीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, त्यामुळे जनता काहीशी सुखावली असली मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर पुन्हा सारे येरे माझ्या मागल्याच होणार का? असा प्रश्न आहे. कारण आजवरचा अनुभव तसा आहे. तलासरी तालुका अनेक समस्यांनी त्रस्त आहे पण याकडे कोणाचेही लक्ष नाही, आदिवासी भाग असल्याने शासकीय कर्मचारी अधिकारी या भागात काम करण्यास नाखूष असतात, त्याचे कारण या भागात सोयी सुविधांचा अभाव, वाहतुकीच्या व शिक्षणाच्या या भागातील मूळ समस्या त्यामुळे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहत शहरात राहून कामाच्या ठिकाणी ये जा करतो याचा परिणाम त्याच्या कामावर होतो व जनतेला या मुळे शासकीय कार्यालयात दररोज फेऱ्या माराव्या लागतात.तलासरीचा मूळ प्रश्न पाण्याचा आहे. पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागते, तलासरी साठी साडे तीन कोटी रु पयाची पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली पण गेले सहा महिने ती बंद आसल्याने आज तलासरीवासियांना पाणी असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तलासरी तालुक्यात परिवहनाची समस्यां असल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तालुक्यात एस टी च्या ठराविक मार्गावरच फेऱ्या चालतात त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक या भागात मोठ्या प्रमाणात, गेल्या दोन वर्षांपासून तलासरी येथे एस टी स्टँड बांधून तयार आहे पण तो सुरु करण्यास अधिकारी चालढकल करीत असल्याने लोकांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.तालुक्यातील सर्वात भीषण समस्या आहे ती शिक्षणाची. शिक्षणा अभावी दरवर्षी शेकडो विद्यार्थी बालमजुरी कडे वळत आहेत, रोजगारा साठी ते गुजरात राज्यात जातात पण तेथे त्याचे शोषण होते त्याकडे आदिवासींचे नेते म्हणविणाऱ्याचे दुर्लक्ष आहे.सध्या तलासरीत होत असलेली अवैध बांधकामे, खदानीत होत असलेली मनमानी, सुरूंगांच्या स्फोटाने विहिरी व बोअरच्या पाण्याची पातळी खालावते आहे. ग्रामस्थांच्या घरांना तडे जात आहेत, तलासरी उड्डाणपुलाखाली शासकीय व राजकीय वरदहस्ताने उभ्या असलेल्या बेकायदा टपऱ्या व त्यात चाललेले अवैध धंदे यामुळे तलासरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे.तलासरीमध्ये अनेक वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता व दहशत आहे. त्यामुळे तलासरी विकासा पासून दूर राहिला अशी विरोधकांची ओरड होती. या दहशतीला कंटाळून जनतेने सत्ता परिवर्तन केले. भाजपची सत्ता आली, आमदार, खासदार भाजपचे व तलासरीतीलच यामुळे तरी तलासरीचा विकास मोठया प्रमाणात होईल अशी जनतेची अपेक्षा होती पण जनतेचा भ्रमनिरास झाला असून भ्रष्टाचारही बोकाळला आहे.स्वागताची तयारीमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तलासरीत जय्यत तयारी असून सुरक्षेसाठी पाचशे अधिकारी व पोलिसांचा ताफा तैनात असून शेकडो वाहनांची धावपळ चालू आहे, ठक्कर बाप्पा विद्यालयाचे मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले असून अग्निशमन दलाचे दोन बंब देखील तैनात आहेत. मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जातील त्यांची दुरु स्ती व रंगरंगोटी मंगळवारपासून सुरु असून त्यावर लाखो रु पये खर्च करण्यात आले आहेत. हे असले तरी या दौऱ्याचा फायदा काय? हा प्रश्नच आहे.