शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जव्हार, मोखाड्यातील दुष्काळाने पालकमंत्री ठरणार सर्वांचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:47 IST

२०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत.

- रविंद्र साळवेमोखाडा : २०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. ते पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदार संघातील जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळी असतांना शासनाने सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे व महसूल विभागाने सुरवातीला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविल्यामुळे जव्हार मोखाडा हे तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून डावलले गेले यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांची उदासीनता या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असून विरोधकांना जव्हार मोखाडयातील जनतेला आकर्षित करण्यासाठी आयते - कोलीत मिळणार आहे पावसाने अडीच महिने हुलकावणी दिल्याने शेतीला आवश्यक पाणी मिळाले नाही यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभे भात पीक पेटवून दिले. यानंतर पालकमंत्र्यांनी शेतक-याच्या बांधावर जाऊन भात पिकांची पहाणी केली तरी देखील जव्हार, मोखाडा हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केले गेले नाहीत.>सर्व पक्षांनी धरले होते विष्णूंना धारेवरशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस ने जव्हार मोखाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी होळी आंदोलन करून, बोंबाबोंब करीत १९ नोव्हेंबरला शिमगा साजरा केला होता यानंतर अंतिम आणेवारी आल्यानंतर १५ डिसेंबर पर्यंत जव्हार, मोखाडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जातील असे अश्वासन देण्यात आले. परंतु हे आश्वासन नेहमीप्रमाणे हवेत विरल्याने येथील आदिवासींकडून पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणावर असंतोष खदखदतो आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पालकमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावरु न लक्ष्य होणार हे मात्र नक्की.