शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रोजगाराचा तिढा सोडवा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:01 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. येथील नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. येथील नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे ^‘रोजगार’ येथील आदिवासी रोहयो मजुरांच्या पाचवीला पुजलेली समस्या आहे. दसरा झाला की येथील रोहयो मजुरांचे स्थलांतर व्हायला सुरवात झाली आहे. जव्हार ग्रामीण भागातून रोहयो मजुरांचे तांडेच्या तांडे मजुरीच्या शोधात निघतांना दिसत आहेत.ग्रामीणभागामध्ये कायस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील रोजगाराची समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल आदिवासींकडून विचारला जात आहे.महाराष्ट्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत शासनाच्या अधिकाºयांकडून मोठा गाजावाजा करून रोहयो मजुरांना काम दिल्याचा मोठा आकडा दाखिवण्यात येतो. मात्र त्या रोहयो मजुरांना रोजगार हमीवर काम मिळते का? तसेच रोजगार हमी मजुरांचे मस्टर काढून काम मिळते, तेही दोन ते चार दिवस काम मिळते. त्यामुळे येथील रोहयो मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळतोतरी कुठे? असाही प्रश्न रोहयो मजुरांकडून विचारला जात आहे.जव्हार तालुक्यात रोहयो मजुरांची जॉबकार्ड धारक नोंदणी झालेली एकूण संख्या- १७ हजार ४०० च्या आसपास आहे. मात्र यापैकी सध्या हजार मजुरांनाही रोजगार दिलेला नाही. अशी अवस्था रोहयो मजुरांची झाली आहे. त्यामुळे शेकडो मजूर रोजगाराच्या शोधात निघायला सुरवात झाली असून, जव्हारच्या बस स्थानकात रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहेत.शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना २००५ वर्षापासून रोजगार हमी योजनेची सुरवात झाली. रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात शासनाने रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वि होतांना दिसत नाही. बºयाचदा सर्व अलबेल असल्याची कागद मात्र रंगवली जातात.भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर, मुंब्रा, या ठिकाणी, गवत कापणे, बिल्डिंग बांधकाम, रेतीबंदर, आणि मिळेल ते काम करण्यासाठी जावे लागत असल्याचे रोहयो मजुरांनी सांगितले.तसेच दिवाळीचा सन अगदी पंधरा दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात आमच्या मुलाबाळांना आम्ही खायला काय देणार असा प्रश्न रोहयो मजुरांना पडला आहे.म्हणून दिवाळीच्या सणासाठी पैसे मिळावे म्हणून बाहेर शहरात जावे लागत आहे. आणि मिळेल ते काम करण्यास जावे लागत आहे. हे करीत असतांना बºयाचदा या आदिवासी मजुरांवर अन्याय होत असतो.जॉबकार्ड धारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समतिी बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण, असा यंत्रणा महात्मा गांधी रोजगार हमी योजतुन रोजगार देनाºया यंत्रणा आहेत.मात्र एकाही मजुराला रोजगार हमीवर वर्षभरात १०५ दिवस काम मिळत नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी रोहयो मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहे.कायवरूपी रोजगार मिळत नसल्याने, अनेक समस्या या आदिवासी ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण होवून भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी या समस्यां भेडसावत आहेत. मात्र, बेरोजगारीचे हे ओझे दरवर्षीचे असल्याने त्यांनाही त्याची सवय झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार