शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

गायमुख ते भाईंदर; २० हजार कोटींच्या प्रकल्पासाठी पाच कंपन्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:09 IST

एमएमआरडीए लवकरच करणार कंत्राटदाराची नेमणूक

मुंबई : मीरा-भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाच कंपन्यांनी १० निविदा दाखल केल्या आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएने जुलैमध्ये काढलेल्या निविदेला कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच कंत्राटदार अंतिम करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गायमुख ते भाईंदर हा १५.५ किमीचा मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार भाईंदर ते फाउंटन हॉटेल, असा १० किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारला जाणार असून, हा मार्ग दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ४ लेनचा असेल. त्यासाठी सुमारे ८५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर फाउंटन हॉटेल ते गायमुख असा ५.५ किमीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातील ३.५ किमीचा दुहेरी भुयारी मार्ग आहे. यात दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन स्वतंत्र बोगदे खोदले जातील. त्यापुढे सुमारे २ किमीचा उन्नत रस्ता असेल. त्यासाठी ११,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

‘एमएमआरडीए’ने १० किमीच्या उन्नत मार्गासाठी आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या ५.५ किमीच्या भुयारी मार्गासाठी स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.  

भाईंदर ते फाउंटन हॉटेल १० किमी लांबीचा उन्नत मार्ग -  अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट फाउंटन हॉटेल ते गायमुख भुयारी आणि उन्नत मार्ग -  अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट 

कसा होणार फायदा? मीरा-भाईंदर येथून ठाण्याकडे जाताना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी अवजड वाहने या रस्त्यावर येत असल्याने कोंडीत भर पडते. त्यातून घोडबंदर फाउंटन ते घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातून काही किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहनांना तासन्  तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामध्ये फाउंटन चौकात आणि गायमुख भागात मोठी कोंडी होते. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तिथे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात अडचण आहे. यावर तोडगा म्हणून गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग उभारला जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर