शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गौरी गणपतीक चाकरमानी निघाली कोकणाक, पालघर आगारातून २३६ एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:39 IST

कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.

- हितेन नाईक ।पालघर : कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.विशेष म्हणजे जादा वाहतुकीसाठी देण्यात येणारे चालक हे निर्व्यसनी व मद्यपान न करणारे असावेत या बाबत कटाक्ष पाळण्यात आला आहे. या बाबत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच मद्यपान केलेल्या चालकास तात्काळ जागेवरच निलंबीत केले जाणार असून आगार व्यवस्थापकावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरात होणार असल्याने तसेच ३० आॅगस्ट ला गौरीपूजन, ३१आॅगस्टला गौरी-गणपती विसर्जन, ५ सप्टेंबर ला अनंत चतुर्दर्शीचा सणांचा कालावधी पाहता २२ आॅगस्ट पासून एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी सुरु वात झाली आहे. तर परतीच्या प्रवासाची मुदत ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या दरम्यानच्या वाहतुकीसाठी पालघर परिवहन विभागांतर्गत वसई, अर्नाळा व नालासोपारा आगारातून एकूण २३६ बसेस बुकिंग झाल्या आहेत.त्या व्यतिरिक्त पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, वाडा या आगारातून नेहमीच्या रु टीन बसेसची व्यवस्था राहणार आहे. वसई तालुक्यातील तीन आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस ची मागणी होत असल्याने औरंगाबाद विभागातून अतिरिक्त २५ बसेस नालासोपारा आगारात ठेवण्यात आल्या असून २२ आॅगस्ट रोजी त्या कोकणात रवाना होणार आहेत. त्यासाठी इतर विभागातून २५ चालक आणण्यात आले आहेत. त्यामुळे एकट्या नालासोपारा आगारातूनच १४५ बसेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.वसई तालुक्यात विरार फाटा ते घोडबंदर या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विभागीय वाहतूक अधिकाºयांनी दोन मार्ग तपासणी पथके व प्रशिक्षण बस गस्त पथक मुंबई-गुजरात महामार्गावर तैनात करावे असे आदेश पालघर विभागाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिले आहेत. आगरातून पाठविण्यात येणाºया बसेसच्या इंधन टाक्या पूर्ण भरूनच देण्यात येणार असून अतिरिक्त इंधनाची सोय चिपळूण व महाड येथे करण्यात आली आहे.या आरक्षणात सुटे आरक्षण आणि संपूर्ण बसचे आरक्षण असे दोन प्रकार आहेत. विविध मंडळे ग्रामविकास मंडळे, गृहनिर्माण संस्था, संस्था यांनी संपूर्ण बसेसच आरक्षित केल्या आहेत. तर व्यक्तिगत स्वरुपातही आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.अतिरिक्त बसेसही उपलब्ध करुन देणार२१ आॅगस्टला अर्नाळा आगरातून पहिली बस रवाना झाली असून २२ आॅगस्ट रोजी ४७ बसेस, २३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १३९ बसेस,२४ आॅगस्ट रोजी २९ बसेस तर २५ आॅगस्ट रोजी २० बसेस अशा एकूण २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास पालघर विभाग त्यासाठी सज्ज असल्याचे नियंत्रक अजित गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.गाड्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व व्यवस्थापकांनी संपर्कात राहून जादा गाड्या पाठविण्यावर भर देण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. वरील नियोजन केलेल्या वाहनां व्यतिरिक्त अचानक गर्दी होऊन मागणी वाढल्यास वसई, अर्नाळा व नालासोपारा आगाराने स्वत:च्या ताफ्यातील बसेस वापराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.चोख व्यवस्था...ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाची पथके रामवाडी ते सावंतवाडी पर्यंत तैनात ठेवण्यात आलेली आहेत. महिला वाहकांना या ड्युटीतून वगळण्यात आले आहे. प्रवाशांचा उद्रेक टाळण्यासाठी त्याची माहिती तात्काळ सूचना फलकावर लावण्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव