शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गौरी गणपतीक चाकरमानी निघाली कोकणाक, पालघर आगारातून २३६ एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:39 IST

कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.

- हितेन नाईक ।पालघर : कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.विशेष म्हणजे जादा वाहतुकीसाठी देण्यात येणारे चालक हे निर्व्यसनी व मद्यपान न करणारे असावेत या बाबत कटाक्ष पाळण्यात आला आहे. या बाबत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच मद्यपान केलेल्या चालकास तात्काळ जागेवरच निलंबीत केले जाणार असून आगार व्यवस्थापकावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरात होणार असल्याने तसेच ३० आॅगस्ट ला गौरीपूजन, ३१आॅगस्टला गौरी-गणपती विसर्जन, ५ सप्टेंबर ला अनंत चतुर्दर्शीचा सणांचा कालावधी पाहता २२ आॅगस्ट पासून एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी सुरु वात झाली आहे. तर परतीच्या प्रवासाची मुदत ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या दरम्यानच्या वाहतुकीसाठी पालघर परिवहन विभागांतर्गत वसई, अर्नाळा व नालासोपारा आगारातून एकूण २३६ बसेस बुकिंग झाल्या आहेत.त्या व्यतिरिक्त पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, वाडा या आगारातून नेहमीच्या रु टीन बसेसची व्यवस्था राहणार आहे. वसई तालुक्यातील तीन आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस ची मागणी होत असल्याने औरंगाबाद विभागातून अतिरिक्त २५ बसेस नालासोपारा आगारात ठेवण्यात आल्या असून २२ आॅगस्ट रोजी त्या कोकणात रवाना होणार आहेत. त्यासाठी इतर विभागातून २५ चालक आणण्यात आले आहेत. त्यामुळे एकट्या नालासोपारा आगारातूनच १४५ बसेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.वसई तालुक्यात विरार फाटा ते घोडबंदर या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विभागीय वाहतूक अधिकाºयांनी दोन मार्ग तपासणी पथके व प्रशिक्षण बस गस्त पथक मुंबई-गुजरात महामार्गावर तैनात करावे असे आदेश पालघर विभागाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिले आहेत. आगरातून पाठविण्यात येणाºया बसेसच्या इंधन टाक्या पूर्ण भरूनच देण्यात येणार असून अतिरिक्त इंधनाची सोय चिपळूण व महाड येथे करण्यात आली आहे.या आरक्षणात सुटे आरक्षण आणि संपूर्ण बसचे आरक्षण असे दोन प्रकार आहेत. विविध मंडळे ग्रामविकास मंडळे, गृहनिर्माण संस्था, संस्था यांनी संपूर्ण बसेसच आरक्षित केल्या आहेत. तर व्यक्तिगत स्वरुपातही आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.अतिरिक्त बसेसही उपलब्ध करुन देणार२१ आॅगस्टला अर्नाळा आगरातून पहिली बस रवाना झाली असून २२ आॅगस्ट रोजी ४७ बसेस, २३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १३९ बसेस,२४ आॅगस्ट रोजी २९ बसेस तर २५ आॅगस्ट रोजी २० बसेस अशा एकूण २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास पालघर विभाग त्यासाठी सज्ज असल्याचे नियंत्रक अजित गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.गाड्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व व्यवस्थापकांनी संपर्कात राहून जादा गाड्या पाठविण्यावर भर देण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. वरील नियोजन केलेल्या वाहनां व्यतिरिक्त अचानक गर्दी होऊन मागणी वाढल्यास वसई, अर्नाळा व नालासोपारा आगाराने स्वत:च्या ताफ्यातील बसेस वापराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.चोख व्यवस्था...ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाची पथके रामवाडी ते सावंतवाडी पर्यंत तैनात ठेवण्यात आलेली आहेत. महिला वाहकांना या ड्युटीतून वगळण्यात आले आहे. प्रवाशांचा उद्रेक टाळण्यासाठी त्याची माहिती तात्काळ सूचना फलकावर लावण्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव