शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

गौरी गणपतीक चाकरमानी निघाली कोकणाक, पालघर आगारातून २३६ एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:39 IST

कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.

- हितेन नाईक ।पालघर : कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.विशेष म्हणजे जादा वाहतुकीसाठी देण्यात येणारे चालक हे निर्व्यसनी व मद्यपान न करणारे असावेत या बाबत कटाक्ष पाळण्यात आला आहे. या बाबत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच मद्यपान केलेल्या चालकास तात्काळ जागेवरच निलंबीत केले जाणार असून आगार व्यवस्थापकावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरात होणार असल्याने तसेच ३० आॅगस्ट ला गौरीपूजन, ३१आॅगस्टला गौरी-गणपती विसर्जन, ५ सप्टेंबर ला अनंत चतुर्दर्शीचा सणांचा कालावधी पाहता २२ आॅगस्ट पासून एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी सुरु वात झाली आहे. तर परतीच्या प्रवासाची मुदत ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या दरम्यानच्या वाहतुकीसाठी पालघर परिवहन विभागांतर्गत वसई, अर्नाळा व नालासोपारा आगारातून एकूण २३६ बसेस बुकिंग झाल्या आहेत.त्या व्यतिरिक्त पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, वाडा या आगारातून नेहमीच्या रु टीन बसेसची व्यवस्था राहणार आहे. वसई तालुक्यातील तीन आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस ची मागणी होत असल्याने औरंगाबाद विभागातून अतिरिक्त २५ बसेस नालासोपारा आगारात ठेवण्यात आल्या असून २२ आॅगस्ट रोजी त्या कोकणात रवाना होणार आहेत. त्यासाठी इतर विभागातून २५ चालक आणण्यात आले आहेत. त्यामुळे एकट्या नालासोपारा आगारातूनच १४५ बसेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.वसई तालुक्यात विरार फाटा ते घोडबंदर या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विभागीय वाहतूक अधिकाºयांनी दोन मार्ग तपासणी पथके व प्रशिक्षण बस गस्त पथक मुंबई-गुजरात महामार्गावर तैनात करावे असे आदेश पालघर विभागाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिले आहेत. आगरातून पाठविण्यात येणाºया बसेसच्या इंधन टाक्या पूर्ण भरूनच देण्यात येणार असून अतिरिक्त इंधनाची सोय चिपळूण व महाड येथे करण्यात आली आहे.या आरक्षणात सुटे आरक्षण आणि संपूर्ण बसचे आरक्षण असे दोन प्रकार आहेत. विविध मंडळे ग्रामविकास मंडळे, गृहनिर्माण संस्था, संस्था यांनी संपूर्ण बसेसच आरक्षित केल्या आहेत. तर व्यक्तिगत स्वरुपातही आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.अतिरिक्त बसेसही उपलब्ध करुन देणार२१ आॅगस्टला अर्नाळा आगरातून पहिली बस रवाना झाली असून २२ आॅगस्ट रोजी ४७ बसेस, २३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १३९ बसेस,२४ आॅगस्ट रोजी २९ बसेस तर २५ आॅगस्ट रोजी २० बसेस अशा एकूण २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास पालघर विभाग त्यासाठी सज्ज असल्याचे नियंत्रक अजित गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.गाड्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व व्यवस्थापकांनी संपर्कात राहून जादा गाड्या पाठविण्यावर भर देण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. वरील नियोजन केलेल्या वाहनां व्यतिरिक्त अचानक गर्दी होऊन मागणी वाढल्यास वसई, अर्नाळा व नालासोपारा आगाराने स्वत:च्या ताफ्यातील बसेस वापराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.चोख व्यवस्था...ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाची पथके रामवाडी ते सावंतवाडी पर्यंत तैनात ठेवण्यात आलेली आहेत. महिला वाहकांना या ड्युटीतून वगळण्यात आले आहे. प्रवाशांचा उद्रेक टाळण्यासाठी त्याची माहिती तात्काळ सूचना फलकावर लावण्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव