शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आंबा फळ तयार होताना बागायतदारांनी काळजी घ्यावी; संरक्षण कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:30 IST

आंब्यावर पडणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी एकरी; ४ या प्रमाणात फळमाशी सापळे बागेत लावावेत. या सापळ्यात फळमाशी आकर्षित होते व त्यात पडून मरते.

अनिरुद्ध पाटील कोकणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. सध्याचे दिवस हे आंब्याला मोहोर येण्याचे आहेत. या दृष्टीने आंबा पीक संरक्षण कसे करावे, याबद्दल डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न : आंब्याला मोहोर आल्यानंतर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो?आंब्याची झाडं मोहरल्यानंतर त्यावर तुडतुडे आणि भुरी या रोगासह फुलकिडे इत्यादीमुळे नुकसान होऊ शकते. तुडतुडे हे मोहोरातील रस शोषतात. त्यामुळे नवीन मोहोर सुकून किंवा गळून जातो. थंडीत मोहोरावर भुरी नावाच्या रोगामुळे राख आल्यासारखी लक्षणे दिसतात. हा रोग वाढून मोहोर काळा पडतो व गळतो.

प्रश्न : या दोन्ही कीड आणि रोगापासून मोहोराचे संरक्षण कसे करावे?पहिली फवारणी मोहोर येण्यापूर्वी पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के हे कीटकनाशक ९ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. दुसरी फवारणी बाँगे फुटण्याच्या वेळी लॅमडा सायलोथ्रिन ५ टक्के कीटकनाशक ६ मिली व सोबत हॅकझाकोनाझोल ५ टक्के हे बुरशीनाशक ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. यानंतर १५ दिवसांनी तिसºया फवारणीकरिता बुफ्रॉफेझिन २५ टक्के हे कीटकनाशक १० मिली व सोबत भुरीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.प्रश्न : हापूस आंब्यामध्ये चांगला मोहोर निघूनही फळे कमी लागण्याचे कारण काय?हापूस आंब्यामध्ये परागीभवन व फळधारणा वाढविण्याच्या दृष्टीने या बागेत केशर, रत्ना यासह अन्य जातींची १० ते १५ झाडे लावावीत. तसेच सर्व जातीच्या झाडांमुळे बागेत चांगले परागीभवन होण्यासाठी एक एकरात मधपेट्या ठेवाव्यात.पाऊस संपल्यानंतर मोहोर येईपर्यंत झाडांना पाणी देऊ नये. एकदा फळधारणा झाली म्हणजे दर १५ दिवसांनी बागेला पाणी द्यावे. एका झाडाला १५० ते २०० लिटर पाण्याची गरज असते.

 

टॅग्स :Mangoआंबा